Ads

Thursday, June 17, 2021

WTC फायनलपूर्वी अजिंक्य रहाणेची सिंहगर्जना, नेमकं काय म्हणाला पाहा व्हिडीओ...

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलपूर्वी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सिंहगर्जना केली आहे. अजिंक्यचा एक व्हिडीओ आता क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये अजिंक्यने फायनलबाबत नेमकं काय सांगितले आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. अजिंक्यने यावेळी सांगितले की, " आम्ही सातत्याने विजय मिळवले आहेत आणि त्यामुळेच आम्ही या फायनलमध्ये पोहोचलो आहोत. दोन वर्षांपासून जेव्हा ही विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरु झाली आहे तेव्हापासून भारतीय संघ सातत्याने दमदार कामगिरी करतो आहे. त्यामुळे आता फायनल खेळण्यासाठी मैदानात कधी उतरणार, यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. इंग्लंडमध्ये फलंदाजांची भूमिका सर्वात महत्वाची असते. इंग्लंडमध्ये काही वेळा ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यावेळी गोलंदाजांना चांगली मदत मिळत असते. त्यावेळी फलंदाज नेमकी कशी कामगिरी करतात, हे पाहणे सर्वात महत्वाचे असते." अजिंक्यने पुढे सांगितले की, " इंग्लंडमध्ये फलंदाजांची भूमिका महत्वाची समजली जाते. त्यामुळे फायनलमध्ये आम्ही कशी फलंदाजी करतो, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. प्रत्येकाचा गेम प्लॅन वेगळा असतो. जे फलंदाजांनी एकत्रितपणे येऊन जे ध्येय ठेवले आहे त्याचा पाठलाग करणे, हे सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे फायनलमध्ये ठरवल्यानुसार आम्ही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत." अजिंक्यला इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. अजिंक्यने इंग्लंडमध्ये आतापर्यंत १० कसोटीत ५५६ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून खेळलेल्या ७३ कसोटीत त्याने ४ हजार ५८३ धावा केल्या असून त्यात १२ शतक आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार केल्यास १७ सामन्यात त्याने १ हजार ९५ धावा केल्या असून या काळात त्याने ३ शतक आणि ६ अर्धशतक केली आहेत. ११५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अजिंक्य अव्वल स्थानी आहे. अजिंक्यने भारताबाहेर ४२ कसोटीत ८ शतक, १५ अर्धशतकांसह २ हजार ९७८ धावा केल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vzth7p

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...