Ads

Wednesday, June 16, 2021

सचिन तेंडुलकर म्हणाला, हा खेळाडू असेल WTC Final मध्ये सर्वात धोकादायक

साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या ऐतिहासिक फायनल सामन्याबाबत चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच चॅम्पियन संघ मिळणार आहे. अशात या कसोटी सामन्यावर सर्व दिग्गज खेळाडू त्यांची मत व्यक्त करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने WTC फायनल सामन्यातील सर्वात धोकादायक खेळाडू कोण असेल याबद्दल सांगितले आहे. वाचा- WTC फायनलबद्दल बोलताना सचिनने सांगितले की, भारतीय संघ न्यूझीलंडचा पराभव करून कसोटीतील सर्वोत्तम संघ ठरले. यासाठी भारताने त्याच्या प्रोसेसवर कायम राहण्याची गरज आहे. तरच निकाल आपल्या बाजूने लागले. या सामन्याची प्रतिक्षा संपूर्ण क्रिकेट विश्व करत आहे. वाचा- अंतिम सामना तटस्थ ठिकाणी होत असल्याने दोन्ही संघांना समान संधी मिळत आहेत. पण तुम्हाला तिनही विभागात चांगली कामगिरी करावी लागले. या कसोटी सामन्याआधी कोणत्या खेळाडूने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली असेल तर तो भारताचा विकेटकीपर आहे, असे सचिन म्हणाला. पंतने टेस्ट चॅम्पियनशिप दरम्यान शानदार कामगिरी केली आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे गोलंदाज आणि ऋषभ पंत यांच्यात होणारी लढत पाहण्या सारखी असेल. न्यूझीलंडसाठी तोच सर्वात धोकादायक खेळाडू असेल. त्याचबरोबर सचिनने आर अश्विन देखील फायनल सामन्यात चांगली कामगिरी करेल असे म्हटले. त्याच्याकडे विकेट घेण्याची संधी असेल. वाचा- न्यूझीलंड संघाबद्दल बोलताना सचिन म्हणाला, गेल्या काही महिन्यात न्यूझीलंडने कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे हे नक्कीच आव्हानात्मक असेल. पण याचा अर्थ असा नाही की न्यूझीलंडचा पराभव करणे अवघड असेल. भारताला चांगली कामगिरी करावी लागले. प्रत्येक विभागात भारताला आघाडीवर रहावे लागले. इंग्लंडमध्ये खेळल्याचा न्यूझीलंडला फायदा होईल का? या प्रश्नावर सचिन म्हणाला, न्यूझीलंडला थोडा फायदा मिळेल. पण भारतीय संघाने देखील एक सराव सामना खेळला आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असेल. मला वाटते की भारतीय संघ पहिल्या पासून तयार आहे. विराट कोहली बद्दल सचिन म्हणाला... भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या फॉमबद्दल अनेकांना प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. पण सचिनला वाटत नाही की विराट फॉममध्ये नाही. एक मोठी खेळल्यानंतर त्याला पुन्हा लय सापडेल. मला या गोष्टीची काळजी वाटत नाही. विराटला कल्पना आहे की त्याने कसोटीतील अखेरचे शतक कधी झळकावले आहे. त्याला माहिती आहे की काय कराचे, असे सचिन म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vtQE2c

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...