Ads

Friday, June 18, 2021

WTC FINAL : पाऊस थांबल्यावर किती मिनिटांत सुरु होऊ शकतो सामना, जाणून घ्या अपडेट...

नवी दिल्ली : पावसामुळे पहिले सत्र वाया गेले आहे. पण पाऊस थांबला तर किती मिनिटांत सामना सुरु केला जाऊ शकतो, याबाबतची अपडेट आता समोर आली आहे. पावसामुळे सध्याच्या घडीला तरी ३० षटकांचा खेळ वाया गेला आहे. पण पाऊस थांबला तर किती मिनिटांमध्ये सामने सुरु होऊ शकतो, याबाबतची माहिती आता पुढे आली आहे. जर पाऊस थांबला तर मैदानातील कर्मचारी पहिल्यांदा पाहणी करतील आणि त्यानंतर पावसाचे पाणी मैदानातून काढण्याचा प्रयत्न करतील. त्याचवेळी पंच आणि सामनाधिकारी यावेळी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मैदानात उतरतील. पावसामुळे मैदानाचे किती नुकसान झाले आहे, हे पहिल्यांदा पाहिले जाईल. कर्मचारी पहिल्यांचा मैदान सुकवण्याचा प्रयत्न करतील. मैदान सुकवल्यावर खेळपट्टीची स्थिती नेमकी कशी आहे, हे पाहिले जाईल. जर मैदान जास्त निसरडे झाले नसेल तर लवकर सामना सुरु केला जाऊ शकतो. पण जर मैदानात जास्त पाणी असेल तर पावसानंतर ६० ते ९० मिनिटे सामना सुरु व्हायला लागू शकतात. त्यामुळे पाऊस थांबल्यावर मैदानाची परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा अंदाज येणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे पावसामुळे मैदानाचे किती नुकसान झाले आहे आणि मैदान खेळण्यायोग्य आहे की नाही, याची खातरजमा पंच आणि सामनाधिकारी यांनी करावी लागेल. त्यानंतर मैदानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सामना सुरु करण्यायाच निर्णय घेतला जाऊ शकतो. आता पावसामुळे जी षटके वाया गेली आहेत त्यांची भरपाई अन्य चार दिवसांच्या खेळात होऊ शकते. पण यासाठी पंच आणि सामनाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल. पण जर असे होऊ शकले नाही तर या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. या दिवशी जी षटके वाया गेली आहेत, ती खेळवण्यात येऊ शकतील. सध्याच्या घडीला या सामन्यात पावसामुळे नेमक किती षटके वाया जातात, हे पहिल्यांदा पाहावे लागले. त्यानंतर ही षटके कशी खेळवायची, याचा विचार पंच आणि सामनाधिकारी करतील. त्यामुळे आता पंच आणि सामनाधिकारी यांची भूमिका या सामन्यात सर्वात महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे पाऊस कधी थांबतो आणि सामना कधी सुरु होतो, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iNxNfW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...