नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी सध्याच्या घडीला एक आनंदाची बातमी आलेली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना जिथे होणार आहे तेथील पाऊस आता थांबलेला आहे. मैदानातील पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. पण सध्याच्या घडीला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाऊस थांबल्याचे पाहायला मिळत आहे. पाऊस थांबल्यावर किती वेळात सामना सुरु होऊ शकतो, पाहा...या व्हिडीओमध्ये पाऊस थांबल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून पाऊस थांबलेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये भारतीय संघातील काही सदस्य मैदानात उतरल्याचेही पाहायला मिळत आहे. पाऊस थांबला तर मैदानातील कर्मचारी पहिल्यांदा पाहणी करतील आणि त्यानंतर पावसाचे पाणी मैदानातून काढण्याचा प्रयत्न करतील. त्याचवेळी पंच आणि सामनाधिकारी यावेळी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मैदानात उतरतील. पावसामुळे मैदानाचे किती नुकसान झाले आहे, हे पहिल्यांदा पाहिले जाईल. कर्मचारी पहिल्यांचा मैदान सुकवण्याचा प्रयत्न करतील. मैदान सुकवल्यावर खेळपट्टीची स्थिती नेमकी कशी आहे, हे पाहिले जाईल. जर मैदान जास्त निसरडे झाले नसेल तर लवकर सामना सुरु केला जाऊ शकतो. पण जर मैदानात जास्त पाणी असेल तर पावसानंतर ६० ते ९० मिनिटे सामना सुरु व्हायला लागू शकतात. वाया गेलेल्या षटकांची भरपाई कशी होणार, जाणून घ्या...जी षटके वाया गेली आहेत त्यांची भरपाई अन्य चार दिवसांच्या खेळात होऊ शकते. पण यासाठी पंच आणि सामनाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल. पण जर असे होऊ शकले नाही तर या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. या दिवशी जी षटके वाया गेली आहेत, ती खेळवण्यात येऊ शकतील. सध्याच्या घडीला या सामन्यात पावसामुळे नेमक किती षटके वाया जातात, हे पहिल्यांदा पाहावे लागले. त्यानंतर ही षटके कशी खेळवायची, याचा विचार पंच आणि सामनाधिकारी करतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qaIlaK
No comments:
Post a Comment