साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढतीला पावसामुळे विलंब झाला आहे. पहिल्या सत्राचा खेळ वाया केल्यानंतर आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी काही षटकांचा खेळ होण्याची आशा निर्माण झाली आहे. वाचा- भारतीय वेळेनुसार रात्री साडेसात वाजता मैदानाचा अधिकृतपणे आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल की आज किती षटकांचा खेळ होईल. पुन्हा पावसाने हजेरी लावली नाही आणि मैदानातील पाणी कमी करण्यात यश आले तर किमान ३० ते ३५ षटकांचा खेळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा- आयसीसीने दिलेल्या अपडेटनुसार काही वेळातच अंपायर आणि ग्राउंडमॅन यांच्यात चर्चा होईल. त्यानंतरच आज सामना होणार की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल. भारतीय संघातील खेळाडू आर अश्विन, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी मैदानाचा फेरफटका मारला. न्यूझीलंडचा खेळाडू कायले जेमिन्सनने देखील सीमारेषेवरून मैदान असे आहे याचा आढावा घेतला. वाचा- सामना सुरू होण्यासाठी कर्मचारी मैदान सुख करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता दोन्ही संघांना प्रथम फलंदाजी करण्याची इच्छा असले. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या पाच दिवसात जितका वेळ वाया जाईल तो खेळ सहाव्या दिवशी म्हणजेच २३ जून रोजी खेळवला जाईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gDQC3E
No comments:
Post a Comment