Ads

Monday, June 14, 2021

WTC FINAL : फायनलचे नवीन नियम आज करण्यात आले जाहीर, काय आहेत जाणून घ्या...

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये १८ जूनपासून विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. या फायनलचे नवीन नियम आज आयसीसीकडून जाहीर करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये नेमकं काय नवीन आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. काय आहेत फायनलचे नवीन नियम, पाहा...आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यॉफ एलार्डिस यांनी सोमवारी फायनलच्या नवीन नियमांची घोषणा केली आहे. फायनलसाठी तीन नवीन नियम बनवण्यात आले आहेत. कसोटी सामना हा पाच दिवसांचा असतो, पण ही फायनल सहा दिवसांची असणार आहे. जर वातावरणामुळे जर खेळ व्यवस्थित होऊ शकला नाही आणि काही षटके वाया गेली तर सहाव्या दिवशी ही फायनल खेळवण्यात येऊ शकते. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययामुळे जर सामन्यावर काही परीणाम होत असेल तर सहाव्या दिवशी सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर जर हा सामना अनिर्णीत राहीला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येणार आहे. यावेळी बक्षिसांची रक्कमही दोन्ही संघांमध्ये विभागण्यात येईल. जर सामना अनिर्णीत राहीला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ९ कोटी रुपये मिळतील. पण जर एखाद्या संघाने हा सामना जिंकला तर त्यांना १६ कोटी आणि उपविजेत्या संघाला ६ कोटी रुपये मिळतील. इंग्लंडमध्ये खेळत असताना चेंडू हा सर्वात महत्वाचा असतो. फायनलसाठी यावेळी ड्युक चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. फायनलसाठी ही तीन महत्वाचे नियम असतील. फायनसलाठी आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. भारतीय खेळाडूंनी सराव सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. रिषभ पंतने सराव सामन्यात शतक झळकावत धडाकेबाज फलंदाजीचा नमुमा पेश केला. त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने सराव सामन्यात ७६ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. जडेजाच्या या कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. रोहित शर्माने ८०हून अधिक, केएल राहुलने शतक, पंतने ९४ चेंडूत नाबाद १२१, शुभमन गिलने ८५ धावा करत फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे आता न्यूझीलंडचा सामना भारतीय संघ नेमका कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळए ही फायनल चांगलीच रंजकदार होईल, असे म्हटले जात आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vrFj2x

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...