नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला अजून बराच वेळ आहे. पण ही फायनल सुरु होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने भारताला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची चिंता चांगलीच वाढेलली असेल. न्यूझीलंडने नेमकं काय केलं, पाहा...सध्या न्यूझीलंडचा संघ हा इंग्लंडमध्येच असून ते कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कहर केल्याचेच पाहायला मिळाले. कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अचूक आणि भेदक गोलंदाजी करत त्यांचा धुव्वाच उडवला. न्यूझीलंडच्या या तिखट गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडची एकही धाव झालेली नसताना त्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत इंग्लंडची ७ बाद ७६ अशी दयनीय अवस्था केली होती. दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची ९ बाद १२२ अशी अवस्था होती आणि त्यांच्याकडे फक्त ३७ धावांची आघाडी होती. न्यूझीलंडकडून यावेळी मॅट हेन्री आणि निल वॅगनर यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले होते. न्यूझीलंडचा संघ यजमान असेलल्या इंग्लंडशी अशी दयनीय अवस्था करू शकतो, तर भारतीय संघाचा कसा निभाव लागणार, याच चिंतेमध्ये भारताचे चाहते असतील. कारण न्यूझीलंड आता दुसरा कसोटी सामना इंग्लंडमध्ये खेळत आहेत आणि ते चांगल्या लयीत आले आहेत. दुसरीकडे भारतीय संघ गेल्या कित्येक दिवसांपासून कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांना लयीत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे भारतासाठी फायनलमध्ये न्यूझीलंडशी दोन हात करणे नक्कीच सोपे नसेल. कारण न्यूझीलंडचा इंग्लंडमध्ये येऊन बराच कालावधी झाला आहे आणि त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतले आहे. त्याचबरोबर त्यांना फायनलपूर्वी दोन कसोटी सामने खेळायलाही मिळाले आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाचे पारडे सध्याच्या घडीला भारतापेक्षा जड वाटत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gt3MPG
No comments:
Post a Comment