Ads

Wednesday, June 16, 2021

मोठी बातमी... स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील अंकित चव्हाणबाबत बीसीसीआयने केली ही मोठी घोषणा...

नवी दिल्ली : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अंकित चव्हाणला दोषी ठरवले होते आणि त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण आता बीसीसीआयने अंकित चव्हाणला दिलासा दिल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये २०१३ साली धक्कादायक स्पॉट फिक्सिंग हा प्रकार घडला होता. या प्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या अंकित चव्हाण, एस. श्रीशांत आणि अजित चंडिला यांच्यावर आजीवन बंदी घालण्याता निर्णय घेण्यात आला होता. पण आता बीसीसीआयने अंकित चव्हाणवरील आजीवन बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमीन यांनी यावेळी सांगितले की, " अंकित चव्हाणवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी घेतला होता. पण आता बीसीसीआयने आपाल हा निर्णय बदलण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अंकित चव्हाणवर आता आजीवन बंदी नसणार आहे, पण अंकितवर सात वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे." अंकितवर सात वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असेल तर त्याच्यावरील ही बंदी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातच संपलेली आहे. त्यामुळे आता अंकित पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होऊ शकतो. ही बातमी समजल्यावर अंकितला आनंद झाला आहे. या निर्णयानंतर त्याने बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिशएनचे आभार मानले आहेत. आता मैदानात उतरून क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे अंकितने यावेळी सांगितले आहे. आजीवन बंदी उठल्यानंतर अंकित म्हणाला की, " माझ्यावरील आजीवन बंदी आता बीसीसीआयने उठवली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने सुनावलेली सात वर्षांच्या बंदीची शिक्षा आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी आता मी उत्सुक आहे. सध्याच्या घडीला करोनाचे संकट आहे, त्याचबरोबर मान्सूनही सुरु झाला आहे. त्यामुळे काही दिवासंनी पुन्हा एकदा मी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या निर्णयासाठी मी बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे मनापासून आभार मानतो. आता मी क्रिकेटच्या मैदानात कधी उतरणार, याचीच उत्सुकता मला आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35sjt4I

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...