Ads

Tuesday, June 15, 2021

भारतीय संघाची घोषणा झाल्यावर विराट कोहलीची चिंता वाढली, पाहा नेमकं काय घडलं...

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलसाठी आज भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. पण भारतीय संघाची घोषणा झाल्यावर विराट कोहलीची चिंता वाढलेली पाहायला मिळत आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...भारतीय संघात पाच फलंदाज आहेत, तर दोन यष्टीरक्षक आहेत. पण त्याचबरोबर भारतीय संघात पाच वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. पण आता विराट कोहलीची चिंता वाढलेली पाहायला मिळत आहे. कारण या सामन्यात पाच वेगवान गोलंदाजांना खेळवणे कठीण आहे आणि त्यांच्यामधून जर ३ वेगवान गोलंदाज निवडायचे असतील तर त्यामध्ये कोणाला संधी द्यायची, हा मोठा प्रश्न विराट कोहलीपुढे असेल. या सामन्यासाठी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांना स्थान मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी आता इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यामध्ये स्पर्धा असेल. इशांत शर्माकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर त्याने इंग्लंडचे दौरेही यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे अनुभवाच्या जोरावर इशांत शर्माचे पारडे जड दिसत आहे. पण सध्याच्या फॉर्मचा विचार केला तर मोहम्मद सिराजचे नाव चांगलेच चर्चेत आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मोहम्मद सिराजने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर उमेश यादवकडेही चांगला अनुभव आहे. पण जर तीन वेगवान गोलंदाज निवडायचे झाले तर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्यामध्ये कडवी स्पर्धा असेल, असे सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळत आहे. भारताने जर तीन वेगवान गोलंदाज खेळवले तर त्यांना आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही संधी देता येणार आहे. या दोघांकडेही चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर हे दोघेही उपयुक्त फलंदाजी करू शकतात. त्यामुळे या दोघांना संधी देण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. पण त्यासाठी कोणत्या तीन गोलंदाजांना आता निवडले जाते, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना नक्कीच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gyAVcJ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...