Ads

Friday, June 4, 2021

महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये होऊ शकतात ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सामने, जाणून घ्या...

नवी दिल्ली : बीसीसीआय आता आयपीएलनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाचा विचार करत आहे. बीसीसीआय सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सामने महाराष्ट्रात आयोजन करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, " बीसीसीआयने विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अखेरचा निर्णय घेण्यासाठी आयसीसीकडे जुलैपर्यंतची वेळ मागितली होती. पण आयसीसीने जून महिन्याच्या अखेरपर्यंतची वेळ बीसीसीआयला दिली आहे. त्यामुळे बीसीसीआयने विश्वचषक भरवण्याची एक योजना बनवली आहे. त्यामुळे विश्वचषकाचे सामने हे मुंबई आणि पुण्यामध्ये खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. पण अजून काही गोष्टींचा विचार बीसीसीआयला करायचा आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच विश्वचषकाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे." मुंबई आणि पुण्याचा विचार केला तर बीसीसीआयला चार स्टेडियम्समध्ये सामने खेळवता येऊ शकतात. मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम आहे, त्याचबरोबर ब्रेबॉर्न स्टेडियमचा विचारही केला जाऊ शकतो. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये डी.वाय. पाटील स्टेडियम आहे. त्याचबरोबर पुण्यातील गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचेही स्टेडियम आहे. त्यामुळे फक्त दोन शहरांमध्ये राहून विश्वचषकाचे सामने खेळवता येऊ शकतात. पण बीसीसीआय आता याबाबत अंतिम निर्णय काय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आयपीएलचे यशस्वीपणे सामने हे मुंबईत खेळवण्यात आले होते. त्याचबरोबर बीसीसीआयला मुंबई आणि पुणे या दोन जवळच्या शहरांमध्ये चार आंतरराष्ट्रीय स्टेडियम्स मिळू शकतात. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात सामने खेळवणे हे बीसीसीआयसाठी सोपे ठरू शकेल. सध्याच्या करोनाच्या काळात जास्त प्रवास न करता विश्वचषकाचे एका दिवसात दोन सामने या चार स्टेडियम्सवर सहज होऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या घडीला बीसीसीआयने हा एक पर्याय निवडला आहे. पण याबाबत बीसीसीआयला अजून थोडा विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर आयसीसीचे नियम नेमके काय आहेत, हेदेखील बीसीसीआयला पाहावे लागणार आहे. त्यानंतरच बीसीसीआय ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा अंतिम निर्णय घेऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच बीसीसीआय ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा नेमका काय निर्णय घेते, हे सर्व चाहत्यांना समजणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uWd3Vv

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...