मुंबई: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ पुढील काही दिवसात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. ही लढत इंग्लंडमधील साऊदम्प्टन येथे होणार आहे. भारताने कसोटीत गेल्या चार ते पाच वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे यात शंका घेण्याचा कारण नाही. तरी देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो आणि तो म्हणजे आता तरी आयसीसीद्वारे आयोजित स्पर्धेतील विजयाचा दुष्काळ संपवणार का? वाचा- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. तर २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. २०१७ मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानने तर २०१९ मध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. वाचा- पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा यांनी याच संदर्भात विराटची तुलना फुटबॉलमधील सुपरस्टार याच्याशी केली आहे. मोठ्या स्पर्धेत सातत्यापूर्ण कामगिरी पेक्षा देहबोली अथवा तुमचा स्वभाव जास्त महत्त्वाचा ठरतो. संयम आणि महत्त्वाच्या क्षणी दाखवलेली जिद्द खेळाडूंना इतर खेळाडूंपेक्षा वेगळ बनवते. वाचा- सर व्हिव्हिएन रिचर्डसन यांच्याकडे पाहा. त्यांनी प्रत्येक मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. WTC फायनल ही विराटसाठी एक मोठी संधी असेल. धावा करून भारताला विजेतेपद मिळवून देण्याची संधी त्याच्याकडे असेल. विराटचा समावेश आधीच दिग्गज फलंदाजांमध्ये होतो. नेतृत्व करून WTC चषक जिंकण्याची त्याला संधी आहे. असा विजय मिळवला तर त्याचा समावेश सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होईल, असे राजा म्हणाले. वाचा- विराट प्रमाणे अर्जेंटिनाच्या मेसीला देखील देशासाठी मोठे विजेतेपद मिळून देता आले नाही. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये हे एक साम्य असल्याचे ते म्हणाले. आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात विराटची कामगिरी फार चांगली झालेली नाही. विराटला न्यूझीलंडविरुद्ध नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवता येईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3glyVVd
No comments:
Post a Comment