Ads

Wednesday, June 2, 2021

भारतीयांमुळे पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० लीगला धोका, जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय...

नवी दिल्ली : भारतीयांच्या प्रवेशामुळे आता पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० सपर लीगला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तान सुपर लीग ही आता युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. पण भारतीयांना प्रवेश दिला तर ही लीग होऊ शकणार नाही, असे आता समोर आले आहे. युएईमधील पाकिस्तान सुपर लीगला ७ जूनपासून सुरुवात होणार आहे. पण आता युएईच्या सरकारने आता अजून एक नवीन नियम काढला आहे. त्यानुसार भारतीयांना आता या लीगमध्ये कोणतेही काम करता येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सर्व भारतीयांचे व्हिसा काढले आहेत, त्याचबरोबर त्यांना दुबईमध्ये क्वारंटाइनही करण्यात आले आहे. पण आता युएई सरकारच्या नव्या नियमामुळे भारतीयांना प्रवेश दिल्यास त्यांना लीग सुरु करता येणार नाही, असे समजते आहे. या लीगमध्ये काही भारतीयांचाही समावेश आहे. पण युएईच्या सरकारने आता भारतीयांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे आता या लीगचे अस्तिस्व धोक्यात आले आहे. कारण या लीगचे ब्रॉडकास्टर्स काही भारतीय आहेत. त्यामुळे युएईच्या सरकारच्या या नियमाचा फटका या लीगला बसू शकतो. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने खास परवानगी घेऊन भारताच्या ब्रॉडकास्टर्सना व्हिसा मिळवून दिला होता. पण आता ही मालिका कव्हर करणाऱ्या भारतीयांच्या प्रवेशावर युएईच्या सरकारने आता आक्षेप घेतला आहे. युएईच्या सरकारने आता एक नवीन नियम बनवला आहे. त्यांना आता रेड लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार या लिस्टमध्ये काही देशांचा समावेश करण्यात आला आहे. या लिस्टमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आबुधाबीच्या आरोग्य मंत्रालयाने आता भारतीयांच्या प्रवेशावर आक्षेप घेतलेला आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय बुधवारी घेणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता यााबत काय निर्णय घेतला जातो, यावर पाकिस्तानच्या सुपर लीगचे भविष्य अवलंबून असेल. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे लक्ष आता बुधवारी येणाऱ्या या निर्णयाकडे लागलेले आहे. कारण पाकिस्तानचे या लीगनंतरचे दौरे ठरलेले आहेत आणि त्यावरही या गोष्टींचा परीणाम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wJhioW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...