Ads

Tuesday, June 8, 2021

श्रीलंका दौऱ्यात कोण असणार भारताचा कर्णधार झाले उघड; एका ट्विटने झाली पोलखोल

मुंबई: भारताचा संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त तुमच्या वाचणात आलेच असेल. भारताचा हा दौरा खास यासाठी ठरणार आहे की, एकाच वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे दोन संघ खेळत असणार आहेत. भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असेल तर दुसरा संघ श्रीलंकेत वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. वाचा- व्हिडिओ श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० मालिकेतील सामन्यांचे वेळापत्रक काल मंगळवारी जाहीर करण्यात आले. या दौऱ्यासाठी भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत देशाचे नेतृत्व करत असल्याने या संघासाठी कर्णधार कोण असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. पण काल दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करताना नकळत कर्णधार कोण असेल हे देखील उघड झाले. वाचा- असे म्हटले जाते की जी गोष्ट प्रसारणकर्त्यांना माहित असते ती गोष्ट अन्य कोणालाच माहिती नसते. सोनी टेनने सोशल मीडियावर भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. या पोस्टमध्ये शिखर धवनचा फोटो लावण्यात आला होता. यावरून हे स्पष्ट झाले की धवनच श्रीलंका दौऱ्यात भारताचे नेतृत्व करले. या गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर सोनीने संबंधित ट्विट डिलीट करून टाकले. वाचा- .. श्रीलंका दौऱ्यासाठी सोबत श्रेयस अय्यरचे देखील नाव आघाडीवर होते. पण सोनी टेनने केलेल्या ट्वीटवरून तरी शिखरच कर्णधार असेल असे दिसते. या दौऱ्यावेळी विराट, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी सारखे खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असतील तर प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य कोच देखील तेथे असतील. त्यामुळे बीसीसीआयने या दौऱ्यासाठी राहुल द्रविडची कोच म्हणून निवड केली आहे. या दौऱ्या आयपीएलमधील युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. लंका दौऱ्यात खेळाडूंची कामगिरी कशी होते यावर निवडसमितीचे लक्ष असेल. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Shv2sp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...