Ads

Sunday, June 13, 2021

Wtc Final : अजिंक्य रहाणेने सांगितली फायनल जिंकण्याची रणनिती, म्हणाला ही गोष्ट करावी लागणार

नवी दिल्ली : विश्व अजिंक्यपद कसोटीची फानयल आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही फायनल जिंकण्यासाठी आता भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने एक खास रणनिती सांगितली आहे. ही रणनिती जर अंमलात आणली तर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची फायनल जिंकू शकतो. फलंदाजी करताना ही गोष्ट करावी लागेल...अजिंक्य रहाणेने एका खास मुलाखतीमध्ये सांगितले की, " इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्यासाठी आव्हान असणार आहे, असे म्हटले जात आहे. पण आव्हानाचा सामना करायला भारतीय संघाला नेहमीच आवडते. हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्याचे एक तंत्र आहे. इंग्लंडमध्ये सरळ बॅटने फलंदाजी केली तर जास्त धावा होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही खेळपट्टीवर स्थिरस्थावर झालात तर तुमच्याकडून जास्त धावाही होऊ शकतात. त्यामुळे फलंदाजी करताना सरळ फटके मारणे आणि जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरावणे, या दोन गोष्टी केल्या तर भारतीय संघ चांगली धावसंख्या उभारू शकतो." फायनलचे दडपण आमच्यावर नसेल... फायनल हा एक मोठा सामना असेल, पण त्याचे दडपण नक्कीच आमच्यावर नाही. कारण आतापर्यंत आम्ही चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळेच फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आम्ही लायक ठरलो आहोत. फायनलच्यापूर्वी सराव करण्यासाठी आम्हाला बराच कालावधी मिळाला आहे आणि हीच गोष्ट आमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे, असे अजिंक्यने यावेळी सांगितले. फलंदाजांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवायला हवी... इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना एक गोष्ट फलंदाजांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही ७० किंवा ८० धावांवर खेळत असाल तरीही एखादा चेंडू तुमची विकेट घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही सावधपणे फलंदाजी करायला हवी. आतापर्यंत भारतीय संघाने चांगली एकजूट दाखवली आहे आणि आम्ही एकत्रितपणे खेळून सामने जिंकले आहेत. त्यामुळे फानयलमध्ये खेळताना भारतीय संघावर जास्त दडपण नसेल. आतापर्यंत जी कामगिरी केली आहे, त्यामध्ये सातत्य राखले तर नक्कीच आम्ही यशस्वी ठरू शकतो, असेही अजिंक्यने यावेळी सांगितले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vpapYB

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...