साऊदम्पटन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या पाचव्या दिवशीही मोठी चुक केल्याचे पाहायला मिळाले. कोहलीच्या या चुकीचा मोठा फटका भारताला बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कोहलीने पाचव्या दिवशी कोणती मोठी चुक केली, पाहा...पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उशिरा सुरु झाला. पाऊस पडल्यावर चेंडू स्विंग करणाऱ्या गोलंदाजाला विकेट मिळवण्याची चांगली संधी असते. भारतीय संघात सध्याच्या घडीला दोन्ही स्विंगसह वेगवान गोलंदाजी करणारा खेळाडू मोहम्मद शमी आहे. पण कोहलीने यावेळी गोलंदाजीची सुरुवात इशातं शर्मा आण जसप्रीत बुमरा यांच्याकडून केली. यावेळी इशांतने गोलंदाजी करताना ऑफ स्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू टाकले, त्यामुळे त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले. पण त्यावेळी जर शमीच्या हाती चेंडू दिला असता तर भारतीय संघाला लवकर विकेट मिळवण्याची दाट शक्यता होती. कारण शमी हा फलंदाजानुसार गोलंदाजी करतो. त्याचबरोबर तो फलंदाजाच्या शरीराच्या जवळ जास्त गोलंदाजी करतो आणि त्यावेळी विकेट मिळण्याची जास्त संधी असते. हे सर्व समीकरण पाहता कोहलीने आपल्या गोलंदाजीची सुरुवात शमीकडून करायला हवी होती, जर तसे झाले असते तर कदाचित आताचे चित्र वेगळे असले असते. कोहलीने ही चुक सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही केली होती आणि त्यावेळी भारताला लवकर विकेट मिळवता आले नव्हते. तीच चुक कोहलीने पुन्हा एका आज केल्याचे पाहायला मिळाले आहे. बुमराकडूनही झाली पहिल्या षटकात मोठी चुक...भारताच्या डावाची सुरुवात बुमराने केली. बुमराच्या या षटकात फक्त एक धाव निघाली. पण हे षटक पूर्ण झाल्यावर आपल्याकडून एक मोठी चुक झाल्याचे बुमराच्या लक्षात आले. बुमराने यावेळी जे टी-शर्ट घातले होते, ते नियमित सामन्यांचे होते. पण फायनलसाठी वेगळे किट दोन्ही संघांना देण्यात आले आहे. भारताच्या नियमित टी-शर्टवर बायजू या कंपनीचा लोगो आहे, तर विश्व अजिंक्यपद कसोटी फायनलच्या टी-शर्टवर देशाचे नाव कोरलेले आहे. बुमराने आपले नियमित कपडे घातले होते, त्यामुळे ही चुक लक्षात आल्यावर बुमरा हा पेव्हेलियनमध्ये धावत गेला आणि नवीन टी-शर्ट घालून आल्याचे पाहायला मिळाले. ही चुक सुधारल्यावर बुमरा पुन्हा मैदानात आला आणि त्याने गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zMTlzh
No comments:
Post a Comment