Ads

Monday, June 7, 2021

तुमच्याकडे ओमान तर आमच्याकडे... ; पाहा टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIचा प्लॅन बी!

नवी दिल्ली: भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपवरून पडद्यामागे बऱ्याच घटना घडत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला () कोणत्याही परिस्थितीत वर्ल्डकपचे आयोजकपद स्वत:च्या हातातून सोडायचे नाही. देशातील करोना परिस्थीती पाहात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आयसीसीकडून ही स्पर्धा अन्य देशात आयोजित करण्याचा गंभीरपणे विचार सुरू आहे. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरित ३१ लढती युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याने आयसीसीला वर्ल्डकपसाठी भारताशिवाय पर्याय नसेल असे वाटत होते. पण आयसीसी वर्ल्डकपमधील लढती ओमान देखील आयोजित करण्याचा विचार करत आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या स्पर्धेची सुरूवात ओमानमध्ये होईल. त्यानंतर उर्वरित लढती युएईमध्ये आयोजित करण्याचा आयसीसीचा विचार आहे. वाचा- अशात बीसीसीआयने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. युएई सोबत टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करण्यासाठी चर्चा सुरू असताना आयसीसीकडून ज्या हलचाली सुरू आहेत ते पाहता बीसीसीआयने श्रीलंकेला सहभागी करून घेतले आहे. टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करण्यात भारताला मदत करण्याची श्रीलंका क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. वाचा- भारतातील करोना परिस्थितीमुळे आणि एमिरात क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. पण आयपीएलचे आयोजन देखील युएईमध्ये होणार असल्याने गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएलमधील लढतीनंतर खेळपट्टी वर्ल्डकपच्या आयोजनासाठी योग्य असणार नाही, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डातील एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता श्रीलंका बोर्डातील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू झाली आहे. पण ती फारच प्राथमिक स्तरावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्पर्धा जरी भारतात झाली नाही तर त्याचे अधिकार बीसीसीआयकडे राहणार आहेत. वाचा- वर्ल्डकपसाठी युएईमध्ये दुबई, शारहाज आणि अबूधाबी सारखे तीन स्टेडियम आहेत. पण श्रीलंकेत अधिक पर्याय आहेत. एकट्या कोलंबो शहरात तीन स्टेडियम आहेत. लंका बोर्डाने आयपीएलमधील उर्वरित लढती खेळवण्याची ऑफर बीसीसीआयला दिली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cnQsL7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...