Ads

Monday, October 26, 2020

आंद्रे रसेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांची ट्वेन्टी-२० लीगमधून माघार

दुबई : धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी काही कारणास्तव श्रीलंका प्रीमिअर ट्वेन्टी-२० लीगमध्ये न खेळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता ते आयपीएलमधील पुढील सामने खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. रसेलला आयपीएलमध्ये खेळताना दुखापत झाल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. रसेलला आयपीएलमध्येच दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही सामन्यांपूर्वी रसेलला खेळत असताना दुखापत झाली होती. रसेलचे स्नायू हे दुखावले गेले होते. त्यामुळे आजच्या सामन्यातही रसेल खेळताना दिसत नाही. या दुखापतीमधून सावरायला रसेलला जास्त वेळ लागेल, असे दिसत आहे. त्यामुळे रसेलने दुखापतींच्या कारणास्तव श्रीलंकेच्या ट्वेन्टी-२० लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फॅफने यावेळी श्रीलंकेच्या प्रीमिअर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण या लीगमध्ये खेळणारा फॅफ हा दक्षिण आफ्रिकेचा एकमेव खेळाडू नाही. फॅफबरोबर डेव्हिड मिलान आणि डेव्हिड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही या लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या मनविंदर बिस्लाने या लीगमधून माघार घेतल्याचे समजते आहे. आयपीएलमध्ये रसेलला लैकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या मोसमात रसेलने दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवत नाही, अशी नाराजी त्याने व्यक्त केली होती. त्यामुळे रसेल आणि कार्तिकमध्ये याबाबत वाद झाल्याचेही पाहायला मिळाले होते. यावर्षी आयपीएल सुरु असताना कार्तिककडून संघाचे कर्णधारपद काढून इऑन मॉर्गनकडे सोपवण्यात आले होते. हा मोठा बदल यावर्षीच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळाला होता. पण संघाचे कर्णधारपद बदलल्यावरही रसेच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसले नाही. त्यानंतर काही कालावधीतच रसेलला दुखापत झाली आणि तो संघातून बाहेर गेल्याचे पाहायला मिळाले. रसेलची दुखापत किती गंभीर स्वरुपाची आहे, याबाबत अधिकृत माहिती अजूनही आलेली नाही. त्यामुळे त्याचा दुखापतीचे स्वरुप अजूनही समजलेले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mn4q2p

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...