Ads

Tuesday, December 24, 2019

फक्त विराट आणि विराटच! विस्डेनकडून कोहलीचे कौतुक!

नवी दिल्ली: दहा वर्षांपूर्वी २४ डिसेंबर २००९ रोजी विराट कोहलीने () वनडे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले होते. कोलकातामध्ये श्रीलंकेच्याविरुद्ध त्याने १०७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षात विराटने ज्या वेगाने धावा केल्या आहेत तो वेग थांबण्याचे नाव घेत नाही. संघातील एक युवा खेळाडूपासून सुरु झालेला विराटचा प्रवास आता एक यशस्वी कर्णधारापर्यंत येऊन पोहोचला आहे. जगतात गेल्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपूट म्हणून विराटचे नाव घेतले जाते. विराटने गेल्या १० वर्षात अन्य फलंदाजांच्यापेक्षा पाच हजार ७७५ अधिक धावा केल्या आहेत. अन्य फलंदाजांच्या तुलनेत विराट २२ शतकांनी पुढे आहे. या विराट कामगिरीमुळेच जगातील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व कोहलीकडे देण्याबाबत कोणाचेच दुमत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली. या संघात भारतातील फक्त विराट कोहलीला स्थान देण्यात आले आणि तेही कर्णधार म्हणून. तर वनडे संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनीकडे देण्यात आले. विशेष म्हणजे धोनीकडे नेतृत्व दिले असेल तरी वनडे संघात विराटला देखील स्थान देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर ७० शतके आहेत. तो सध्या ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (७१) आणि सचिन तेंडुलकर (१००) यांच्या मागे आहे. याशिवाय विराटची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सरासरी ५० पेक्षा अधिक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत पॉन्टिंग २७ हजार ८४३ धावांसह दुसऱ्या तर ३४ हजार ३५७ धावांसह सचिन पहिल्या स्थानावर आहे. विस्डेनने देखील केले कौतुक विस्डेनद्वारे जाहीर करण्यात आलेल्या कसोटी संघाचे कर्णधारपद विराटकडेच देण्यात आले आहे. कोहली वगळता भारताच्या रविचंद्रन आश्विनला या संघात स्थान मिळाले आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये ८४ सामन्यात ७ हजार २०२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५४.९७ इतकी असून यात २७ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. केवळ कसोटीच नव्हे तर वनडे संघाचे नेतृत्व देखील विराटकडेच देण्यात आले आहे. या संघात भारताच्या रोहित शर्माला आणि धोनीला देखील जागा देण्यात आली आहे. वनडे प्रकारात विराटने २४२ सामन्यात ११ हजार ६०९ धावा केल्या असून त्याची सरासरी ५९.८४ इतकी आहे. वनडेत त्याने ४३ शतके आणि ५५ अर्धशतके झळकावली आहेत. आयसीसी रँकिंगमध्ये देखील टॉप आयसीसी कसोटी क्रमवारीत वर्षाच्या अखेरीस फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी राहिला. मंगळवारी जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार कोहली ९२८ गुणांसह पहिल्या तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. वनडे क्रमवारीत देखील विराट ८८७ गुणांसह पहिल्या तर रोहित शर्मा ८७३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZjQ60z

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...