सिडनी: क्रिकेटमधील 'लेग बाइज'चा नियम रद्द करा, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू यानं केली आहे. फलंदाजाला चेंडू टोलवता आला नाही म्हणून त्याच्या संघाला धाव देणं अयोग्य आहे,' असं मत त्यानं मांडलं आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजानं चेंडू न टोलवताही संघाला अनेकदा धावा मिळतात. त्या अतिरिक्त धावा म्हणून मोजल्या जातात. या फलंदाजाच्या खात्यात जमा होत नसल्या तरी संघाला त्याचा फायदा होतो. अशा धावांत वाइड, नो आणि 'लेग बाइज'च्या धावांचा समावेश असतो. चेंडू फलंदाजाच्या बॅटला न लागता शरीराच्या इतर कुठल्याही भागाला (हात वगळून) लागल्यास व फलंदाजानं धाव घेतल्यास ती 'लेग बाय' म्हणून गणली जाते. मार्क वॉचा अशा धावांना आक्षेप आहे. वाचा: बिग बॅश लीग (BBL)मध्ये मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात समालोचन करताना त्यानं क्रिकेटमधील या नियमाबाबत मत व्यक्त केलं. 'क्रिकेटमधील एक नियम बदलण्याची माझी इच्छा आहे. 'लेग बाइज'ची धाव नसावी असं माझं मत आहे. विशेषत: टी-२० मध्ये. फलंदाजाला चेंडू समजलाच नसेल तर धाव कशाला द्यायची,' असा सवाल त्यानं केला. वाचा: त्याच्यासोबत समालोचन करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं मात्र सावध पवित्रा घेतला. हा खेळाचा भाग आहे, असं तो म्हणाला. मात्र, मार्क वॉ आपल्या मतावर ठाम राहिला. 'हा खेळाचा भाग असेलही. पण त्यात योग्य सुधारणा व्हायला हवी. फलंदाजीचा अर्थ चेंडू टोलवणं हा आहे. ज्यानं हा नियम बनवला तो कुणीतरी किरकोळ फलंदाज असला पाहिजे,' अशी टिप्पणीही मार्कनं केली. वाचा: बदलत्या काळाबरोबर क्रिकेटच्या खेळातील नियमही बदलत आले आहेत. अनेकदा हे बदल खेळाडूंकडून सुचवले जातात. त्याचा विचार केला जातो. मार्क वॉच्या या सल्ल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती काय निर्णय घेते, हे पाहावं लागणार आहे. वाचा:
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MUBFec
No comments:
Post a Comment