Ads

Monday, January 6, 2020

चार दिवसीय कसोटीवर चर्चा होणारच, आयसीसी ठाम

इंदूर: चार दिवसीय कसोटीच्या आयोजनाच्या प्रस्तावावर भारतीय कर्णधार विराट कोहलीसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी टीका केली असताना, आयसीसीची क्रिकेट समिती मार्चमध्ये या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. २७ ते ३१ मार्च या कालावधीत दुबईमध्ये आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे, अशी माहिती समितीचे प्रमुख आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी दिली. चार दिवसीय कसोटी क्रिकेटच्या प्रस्तावाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी या प्रस्तावावर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा देखाली समावेश आहे. मात्र, चार दिवसीय कसोटीच्या प्रस्तावावर आयसीसीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कुंबळे यांनी सांगितलं. 'मी या समितीचा भाग असल्यामुळं सध्या तरी याबाबत माझे वैयक्तिक मत मांडू शकत नाही. यावर बैठकीत चर्चा करून प्रतिक्रिया देईन,' असं कुंबळे यांनी सांगितलं. अँड्र्यू स्ट्रॉस, राहुल द्रविड, माहेला जयवर्धने आणि शॉन पोलाक यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटपटू या समितीमध्ये आहेत. हा प्रस्ताव २०२३ ते २०३१ या कालावधीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या प्रस्तावावर टीका केली आहे. त्यात कोहली, सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग यांचा समावेश आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया बोर्डाचे सदस्य या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार आहेत. तर बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल असं म्हटलं आहे. गुवाहटीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्याआधीच कोहलीनं या मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत मांडलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने () प्रस्तावित केलेल्या चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कडाडून विरोध केला होता. कसोटी क्रिकेटच्या स्वरुपात कोणत्याही प्रकारे बदल करू नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. दिवस-रात्र कसोटी खेळवणे ही वेगळी बाब आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चुरस निर्माण व्हावी, त्याकडे क्रिकेटप्रेमी आकर्षित व्हावेत आणि व्यावसायिकरणाच्या दृष्टीने दिवस-रात्र कसोटीचा निर्णय योग्य होता. त्यामुळे दिवस-रात्र कसोटीला माझा पाठिंबा होता, असं कोहली म्हणाला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZVYvaT

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...