नवी दिल्ली: भारताच्या खात्यात आणखी एका वर्ल्डकपची भर पडेल, अशी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक यांची अपेक्षा आहे. या संघात क्षमता आहे आणि खेळाडूंना केवळ आपल्या मागील चुकांपासून धडा घ्यावा लागेल. मानसिकदृष्ट्या आणखी कणखर व्हावं लागेल, असं शास्त्रींचं मत आहे. या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून करत आहे. त्याआधी त्यांनी 'एनबीटी'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी अंतिम संघ निवडीमध्ये आयपीएलची भूमिका महत्वाची असेल, असं ते म्हणाले. लोकांनी आयपीएलपर्यंत वाट पाहावी. मी कुणाचंही म्हणणं खोडून काढणार नाही. एखादा जायबंदी असेल तर, कोण कशी कामगिरी करतो हे आयपीएलमध्येच समजेल. आयपीएलमधून एक किंवा दोन खेळाडू मिळू शकतात, ज्यांचा आपण कधीच विचार केला नाही आणि त्यांना खेळवावं लागेल. त्यावेळची कामगिरी खूपच महत्वाची असेल. कारण आयपीएलनंतर वर्ल्डकपपर्यंत अवघे तीन-चार महिनेच आपल्या हातात असतील. आयपीएलच्या माध्यमातून आपल्याला अंतिम १६-१७ खेळाडूंची निवड करण्यास मदत मिळेल, असं शास्त्री यांनी सांगितलं. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये टीम इंडियानं कामगिरीत सातत्य दाखवलं ते बघता हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सर्वात चांगलं ठरलं असं मला वाटतं, असं शास्त्री म्हणाले. यावेळी त्यांनी वर्ल्डकपमधील संघाच्या कामगिरीविषयीही मत व्यक्त केलं. ओल्ड ट्रॅफर्डवर 'त्या' १५ मिनिटांत चांगली कामगिरी केली असती तर, कदाचित हे वर्ष आणखी उत्तम ठरले असते, असं सांगत त्यांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाचाही उल्लेख केला. २०२०मधील आव्हानं २०१९मध्ये ज्या प्रकारे आपल्या खेळाडूंनी सातत्य राखलं, तशी कामगिरी या वर्षीही करावी एवढीच अपेक्षा आहे, असं रवी शास्त्री म्हणाले. खेळाडू जायबंदी होऊ नयेत इतकीच प्रार्थना करतो. कारण गेल्या वर्षाअखेरीस भारताला या समस्येचा सामना करावा लागला. खेळाडू जायबंदी झाले तरी, सुदैवानं खूप मोठं नुकसान सोसावं लागलं नाही, असंही ते म्हणाले. लक्ष वेधून घेणारे खेळाडू पृथ्वी शॉनं गेल्या वर्षी चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर तो जायबंदी झाला. शुभमन गिल हा देखील उत्तम खेळाडू आहे. गोलंदाजीत दीपक चहरनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याला आपल्या तंदुरुस्तीवर लक्ष द्यावं लागेल. युवा खेळाडूंना संधी भारत अ संघात निवड झालेल्या अनेक युवा खेळाडूंना मोठी संधी असेल. न्यूझीलंडला जाण्यापूर्वी निवड समिती सदस्यांचं लक्ष वेधून घेण्याची संधी त्यांच्याकडे आहे. दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार हे जायबंदी आहेत. त्यामुळं गोलंदाजांसाठीही संधी असेल. हे दोघेही काही दिवस संघाबाहेर असतील. त्यामुळं निवडकर्त्यांची युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल. विराट-रोहितमध्ये स्पर्धा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कोणतीही स्पर्धा नाही. दोघेही एकमेकांचा तितकाच आदर करतात. संघात एकजूट आहे. त्यापेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही. ते दोघेही चांगलं खेळत आहेत. संघासाठी आणखी चांगलं काय करता येईल यासाठी ते प्रयत्नशील असतात, असं शास्त्री म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37uYkpm
No comments:
Post a Comment