Ads

Tuesday, January 26, 2021

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी हा आहे भारताचा मास्टर प्लॅन

चेन्नई: भारत आणि इंग्लंड () यांच्यात पुढील महिन्यापासून चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील पहिली लढत चेन्नईत पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी शानदार अशी आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जाते. त्याच टीम इंडियाने नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. अशीच कामगिरी भारत पुन्हा करण्यास उत्सुक असेल. वाचा- परदेशात मालिका विजय मिळवणारा भारतीय संघ मायदेशात देखील विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल यासाठीच संघात अव्वल फिरकीपटूंना स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी म्हणजेच २०१६ साली जेव्हा इंग्लंड भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी मिळून इंग्लंडच्या ९३ पैकी ५४ विकेट घेतल्या होत्या आणि भारताने पाच सामन्यांची मालिका ४-० ने जिंकली होती. वाचा- या वेळी अंगठ्याच्या फॅक्चर रविंद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यापैकी एकाला अश्विन सोबत संघात घेतले जाऊ शकते. जडेजाने कसोटीत घेतलेल्या २२० विकेटपैकी १५७ विकेट भारतात घेतल्या आहेत. ९ वेळा त्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. पण आता जडेजा नसताना संघाला कमी अनुभवी फिरकीपटूला संघात घ्यावे लागेल. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या दोन कसोटीत भारताकडे उपलब्ध असलेल्या फिरकीपटूंपैकी कुलदीपकडे ६, सुंदरकडे १ तर अक्षर पटेलकडे एकाही कसोटीचा अनुभव नाही. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यात सुंदरसह तीन फिरकीपटू असू शकतात. कुलदीप यादवला देखील संधी मिळू शकते. त्याने नेटमध्ये खुप सराव केला आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. वाचा- कुलदीपने गेल्या दोन वर्षात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीत अ संघाविरुद्धच्या सामन्यात १६ ओव्हरमध्ये त्याने एकही विकेट घेतली नव्हती. त्यामुळेच कुलदीपच्या जागी सुंदरला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली कामगिरी केली होती. चेन्नई हे सुंदर आणि अश्विनचे घरचे मैदान आहे. याचा फायदा घेण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39ZWOOY

मोठा खुलासा... राहुल द्रविडने भारताच्या गोलंदाजाविरुद्ध दिल्या होत्या प्रतिस्पर्धी फलंदाजाला टिप्स

नवी दिल्ली : एक मोठा खुलासा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात झालेला आहे. भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडनेच भारताच्या गोलंदाजाविरुद्ध खेळण्याच्या टीप्स एका प्रतिस्पर्धी फलंदाजाला दिल्याचे आता पाहायला मिळत आहे. ही गोष्ट २००२ साली घडली होती. जेव्हा एक संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील एका फलंदाजाला भारताचा माजी महान गोलंदाज अनिल कुंबळे याचा सामना करताना अडचण येत होती. त्यावेळी द्रविडने अनिल कुंबळेच्या गोलंदाजीविरुद्ध कशी फलंदाजी करायची, याचा टीप्स दिल्या होत्या. द्रविडने नेमक्या कोणत्या टीप्स दिल्या होत्या, पाहा... याबाबतचा मोठा खुलासा झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ततेंदा तैबूने केला आहे. याबाबत तैबू म्हणाला की, " आम्ही २००२ साली जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आलो होतो, तेव्हा मला कुंबळेची गोलंदाजी चांगल्यापद्धतीने खेळता येत नव्हती. माझ्यासमोर त्यावेळी मोठी अडचण होती की, कुंबळेच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा. त्यावेळी भारताच्या राहुल द्रविडने मला काही टिप्स दिल्या होत्या." याबाबत तैबु पुढे म्हणाला की, " कुंबळेच्या गोलंदाजीचा सामना करताना मध्यमगती गोलंदाज सामना करत आहे, असे समजून तु फलंदाजी कर. पण त्यावेळी बॅट ही पॅडच्या समोर यायला हवी. त्याचबरोबर चेंडूवर अखेरपर्यंत लक्ष ठेवायला हवे. ही गोष्ट जर तु केलिस तर तुला चांगली फलंदाजी करता येऊ शकते. या मालिकेत खेळत असताना मला कुंबळेने चारपैकी तिनवेळा आऊट केले होते. त्यानंतर मी ही गोष्ट द्रविडला सांगितली होती आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना द्रविडने मला हा सल्ला दिला होता." सध्याच्या घडीला ही गोष्ट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने सर्वांसमोर आणली आहे. याबाबतचे एक ट्विट पीटरसनने केले होते. पीटरसनने आपल्या पुस्तकामध्ये हा प्रसंग लिहिला होता. त्यानंतर ही गोष्ट सर्वांपुढे आली होती. पण याबाबत अजूनही द्रविडने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे ही गोष्ट खरंच घडली आहे का, हे द्रविडच्या वक्तव्यानंतरच त्याव शिक्कामोर्तब होऊ शकेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Mry4H6

IND vs ENG : भारताविरुद्ध ही चुक चांगलीच महागात पडेल, इंग्लंडच्या संघाला मिळाला धोक्याचा इशारा

नवी दिल्ली, : भारताविरुद्धचा इंग्लंडचा दौरा अजूनही सुरु झालेला नाही. पण इंग्लंडच्या संघाला यावेळी दौरा सुरु होण्यापूर्वीच एक धोक्याचा इशारा मिळालेला आहे. त्यामुळे भारताविरुद्धची ही एक चुक त्यांना चांगलीच महागात पडू शकते, असे त्यांना माजी कर्णधारानेच सांगितले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने यावेळी इंग्लंडच्या संघाला दौरा सुरु होण्यापूर्वीच काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाबरोबर नेमकी कोणती गोष्ट करू नका, असे म्हणत हुसेनने यावेळी इंग्लंडच्या संघाला सावधानतेचा इशाराही दिला आहे. यावेळी हुसेन म्हणाला की, " ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ ०-१ अशा पिछाडीवर होता. त्यानंतर भारताकडे विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू नव्हता, त्याचबरोबर त्यांची गोलंदाजीही पंगु झाली होती. पण त्यानंतर मात्र भारतीय संघाने ही मालिका जिंकली. त्यामुळे भारतीय संघाला कमी लेखण्याची घोडचुक कोणीही करु नये." इंग्लंडने भारताविरुद्ध हीच चुक करु नये...भारताविरुद्ध खेळताना इंग्लंडच्या संघाने कोणती चुक करू नये, याबाबत हुसेन म्हणाला की, " भारतीय संघ हा मजबूत आहे. त्यामुळे भारतीय संघाला डिवचण्याचा प्रकार करु नका किंवा त्यांच्याविरुद्ध शाब्दिक शेरेबाजी करू नका. कारण भारतीय संघ सध्याच्या घडीला हे सर्व पेलण्यासाठी मानसीकदृष्ट्या सक्षम आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ नेहमीच वरचढ राहिलेला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा चांगला आक्रमक असून त्याने संघाला मजबूत बनवले आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने भारताविरुद्ध ही चुक नक्कीच करु नये. कारण ही गोष्ट त्यांना चांगलीच महागात पडू शकते." इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला की, " भारतामध्ये फलंदाजी करणं ही सोपी गोष्ट नाही. जर संघात भारतीय खेळपट्यांचा अनुभव असलेला खेळाडू असेल तर त्याला नक्कीच संधी द्यायला हवी, असे मला वाटते. सध्याच्या घडीला इंग्लंडच्या संघात भारताचा चांगला अनुभव असलेले तीन खेळाडू आहेत. पण त्यांच्यामधील एका खेळाडूला या संघात संधीच दिलेली नाही. भारतासारख्या बलाढ्य संघाशी दोन हात करायचे असेल तर अशा चुका करुन इंग्लंडला नक्कीच चालणार नाही." वॉनला यावेळी इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोव्हबाबत बोलायचे आहे. कारण आतापर्यंत जॉनी बऱ्याचदा भारतामध्ये खेळलेला आहे. येथील वातावरण आणि खेळपट्यांचा त्याला चांगलाच अनुभव आहे. पण भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंडच्या संघात मात्र जॉनीला स्थान देण्यात आलेले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cdSyxR

IND vs ENG : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच इंग्लंडला मिळाला घरचा अहेर, माजी कर्णधाराने कान टोचले

नवी दिल्ली, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अजूनही सुरु झालेली नाही. पण या मालिकेपूर्वीच इंग्लंडच्या संघाला घरचा अहेर मिळाला आहे. कारण इंग्लंडच्या माजी कर्णधारानेच त्यांच्या संघाचे कान टोचल्याचे आता समोर आले आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. पण या संघनिवडीवरुन इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा चांगलाच वैतागलेला दिसत आहे. कारण भारतामध्ये चांगली फलंदाजी करू शकणाऱ्या खेळाडूलाच यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने संधी न दिल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत वॉन म्हणाला की, " भारतामध्ये फलंदाजी करणं ही सोपी गोष्ट नाही. जर संघात भारतीय खेळपट्यांचा अनुभव असलेला खेळाडू असेल तर त्याला नक्कीच संधी द्यायला हवी, असे मला वाटते. सध्याच्या घडीला इंग्लंडच्या संघात भारताचा चांगला अनुभव असलेले तीन खेळाडू आहेत. पण त्यांच्यामधील एका खेळाडूला या संघात संधीच दिलेली नाही. भारतासारख्या बलाढ्य संघाशी दोन हात करायचे असेल तर अशा चुका करुन इंग्लंडला नक्कीच चालणार नाही." वॉनला यावेळी इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोव्हबाबत बोलायचे आहे. कारण आतापर्यंत जॉनी बऱ्याचदा भारतामध्ये खेळलेला आहे. येथील वातावरण आणि खेळपट्यांचा त्याला चांगलाच अनुभव आहे. पण भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंडच्या संघात मात्र जॉनीला स्थान देण्यात आलेले नाही. आयपीएलमध्ये जॉनी भारतामध्ये बऱ्याच कालावधीसाठी खेळला आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघात फक्त काहीच खेळाडूंना भारतामध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अन्य संघातील खेळाडू आतापर्यंत भारतामध्ये कसोटी मालिका खेळलेले नाहीत. त्यामुळे जॉनी हा इंग्लंडच्या संघासाठी एक चांगला पर्याय ठरला असता. पण इंग्लंडच्या संघाने मात्र त्याला संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला या संघ निवडीचा फटका बसू शकतो, असे वॉनचे म्हणणे आहे. कारण सध्याच्या घडीला भारतीय संघ चांगल्या फॉर्मात असून इंग्लंडने आपल्या संघात अनुभवी खेळाडूला स्थान देणे महत्वाचे होते, असे वॉनला वाटत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sZDF8o

टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने 'ही' गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार

नवी दिल्ली, : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजारा दिलं आहे. पुजाराने जर हे चॅलेंज पूर्ण केलं तर अश्विन अर्धी मिशी ठेवून मैदानात उतरणार असल्याचे ठरलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये काही दिवसांत कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी अश्विन आणि भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यामध्ये एका युट्यूब चॅनेलवर संवाद सुरु होता. यावेळी अश्विनने एक चॅलेंज या मालिकेसाठी पुजारासाठी दिलं आहे. आता पुजाराने हे चॅलेंज जर पूर्ण केलं तर अश्विनला अर्धी मिशी काढून मैदानात उतरावे लागणार आहे. या संवादामध्ये अश्विनने विक्रम यांना एक प्रश्न विचारला. अश्विन म्हणाला की, " आतापर्यंत पुजाराने फिरकीपटूवर जोरदार आक्रमण लगावलेले नाही. आतापर्यंत पुजारा कोणत्याही फिरकीपटूच्या गोलंदाजीवर हवेत मोठा फटका मारल्याचे पाहायला मिळाले नाही. पुजारा कधी फिरकीपटूच्या गोलंदाजीवर पुढे येऊटन हवेत मोठा फटका मारेल?" अश्विनच्या प्रश्नावर राठोड म्हणाले की, " ही गोष्ट प्रगतीपथावर आहे, असे आपण म्हणू शकतो. कारण मी पुजाराला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, एकदा तरी फिरकीपटूच्या गोलंदाजीवर पुढे येऊन तु हवेत मोठा फटका मारायला हवा. पण आतापर्यंत पुजाराने तसं केलेलं नाही आणि त्याने आपण असं का केलं नाही, याचे कारणही मला सांगितलं आहे." राठोड यांच्या उत्तरावर अश्विनने सांगितले की, " जर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुजाराने मोइन अली किंवा इंग्लंडच्या कोणत्याही फिरकीपटूच्या गोलंदाजीवर पुढे येऊन हवेत फटका मारला तर मी माझी अर्धी मिशी कापून टाकेन आणि तसाच मी मैदानात उतरेन. पुजारासाठी मी हे खुले चॅलेंज देत आहे." आता पुजारा हे खुले चॅलेंज स्विकारणार का आणि जर त्याने हे चॅलेंज पूर्ण केलं तर अश्विन अर्धी मिशी काढून मैदानात उतरणार का, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागलेली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3plGnTF

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर झाली पहिली मॅच; पाहा व्हिडिओ

अहमदाबाद: जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान () भारतातील गुजरातमधील अहमदाबाद येथे आहे. (motera stadium )ला आता सरदार पटेल स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. २६ जानेवारी २०२० रोजी याचे उद्घाटन झाले होते. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याचे अधिकृत उद्घाटन केले नव्हते. आता या मैदानावर पहिली क्रिकेट मॅच झाली आहे. वाचा- देशात सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतील नॉकआउटच्या लढती मोटेरा मैदानावर होणार आहेत. २६ जानेवारी म्हणजे आज पहिली क्वार्टर फायनल लढत पंजाब विरुद्ध कर्नाटक यांच्यात झाली. यासह या मैदानावर अधिकृतपणे प्रतिस्पर्धी क्रिकेटला सुरूवात झाली. बीसीसीआयने या मैदानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- मोटेरा मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. याआधीचे जगातील सर्वात मोठे मैदान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदान होते. गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठे मैदान म्हणून मोटेराचा समावेश व्हायचा असेल तर या मैदानावर तितके प्रेक्षक उपस्थित राहणे गरजेचे आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या दाव्यानुसार या मैदानावर १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात. वाचा- वाचा- या मैदानावर ऑलिंपिकसाठीचे स्विमिंग पूल आहे. त्याच बरोबर ११ खेळपट्टी आहेत ज्या लाल आणि काळ्या मातीपासून तयार केल्या आहेत. चार ड्रेसिंग रूम आहेत. हे मैदान ६३ एकर परिसरात उभारण्यात आले आहे. ज्यात क्रिकेट शिवाय बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेनिस असे कोर्ट आहेत. इतक नव्हे तर हॉकी आणि फुटबॉल फिल्ड या परिसरात आहेत. या मैदानाकडे पाहिल्यानंतर भारत ऑलिंपिकच्या आयोजनाची तयारी करत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36gpBxw

इंग्लंडचा हा खेळाडू मोडू शकतो सचिन तेंडुलकरचा विक्रम

लंडन: इंग्लंडचे माजी सलामीचे फलंदाज () यांनी संघाचा विद्यमान कर्णधार जो रूट () संदर्भात एक मोठे विधान केले आहे. भारताचा माजी फलंदाज ()चा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता रुटमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा- इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात रुटने चार डावात १०६.५०च्या सरासरीने ४२६ धावा केल्या. २२८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती आणि इंग्लंडने मालिका २-०ने जिंकली. वाचा- पुढील महिन्यात इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच फेब्रुवारीपासून कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. रुट सध्या इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर कसोटीत दोन द्विशतक करणारा तो पहिला कर्णधार आहे. वाचा- 'द टेलीग्राफ'मधील लेखात बॉयकॉट लिहितात, डेव्हिड गॉवर, केव्हीन पिटरसन आणि माझ्यापेक्षा अधिक धावा करण्याचे तर सोडाच. पण जो रूटमध्ये २०० कसोटी सामने खेळून सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावा मोडण्याची क्षमता आहे. रुट आता ३० वर्षाचा आहे आणि त्याने ९९ कसोटीत ८ हजार २४९ धावा केल्या आहेत. जर त्याला गंभीर दुखापत झाली नाही. तर तो सचिनच्या १५ हजार ९२१ धावांचा विक्रम मोडू शकतो, असे ते म्हणाले. वाचा- रुटची तुलना आधीच्या पिढीतील दिग्गज फलंदाजांची केली जाऊ नये. त्याची कामगिरी सध्याच्या फलंदाजांशी केली जावी. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियमसन हे चांगले फलंदाज आहेत. जे अधिक धावा करत आहेत. आपण रुटच्या फलंदाजीचा आनंद घेतला पाहिजे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c8FABL

Ind vs Eng: 'या' कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत भारताचे पारडे जड

चेन्नई: पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याची सुरूवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार असून पहिल्या दोन लढती चेन्नईच्या चेपॉक () अर्थात एम ए चिदंबरम मैदानावर () होणार आहे. या मैदानावर होणाऱ्या लढती आधी भारतीय संघाचे पारडे जड झाले आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांपैकी पहिल्या दोन लढती चेन्नईत होतील. तर उर्वरीत दोन लढती अहमदाबाद येथे होणार आहेत. पाच फेब्रुवारीपासून पहिली कसोटी तर १३ ते १७ दरम्यान दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ९ कसोटी सामने झाले आहेत. यापैकी पाच सामन्यात भारताने तर इंग्लंडने तीन सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघात १९८२ साली झालेली कसोटी मॅच ड्रॉ झाली होती. वाचा- भारताने २०१६ साठी इंग्लंडचा या मैदानावर ७५ धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात करूण नायरने त्रिशतक झळकावले होते. विरेंद्र सेहवागनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज होता. त्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात मोइन अली (१४६) आणि जो रूट (८८) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ४७७ धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल भारताने ७५९ धावांवर डाव घोषित केला. भारताचा कसोटीतील हा सर्वोच्च स्कोअर आहे. पहिल्या डावात भारताकडून नायरने नाबाद ३०३, लोकेश राहुलने १९९ धावा केल्या. इंग्लंडला दुसऱ्या डावात फक्त २०२ धावा करता आल्या. वाचा- भारतीय संघाने चेपॉक मैदानावर आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी १४ मध्ये विजय, ६ मध्ये पराभव तर ११ सामने ड्रॉ झालेत. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YfTcmE

पंतच्या फलंदाजीचा क्रम; टीम इंडियासाठी मास्टर स्ट्रोक ठरलेला निर्णय या व्यक्तीने घेतला

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अखेरच्या दोन सामन्यात ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. प्रथम सिडनी आणि त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये त्याने धमाकेदार फलंदाजी केली. पंतच्या या खेळीमुळे भारतीय संघाला मोठा फायदा झाला आणि मालिकेत विजय मिळवता आला. भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात पंतची महत्त्वाची भूमिका होती. सिडनी कसोटी त्याने ९७ धावा केल्या. ज्या सामन्यात भारताच पराभव होईल असे वाटत होते तेथे पंतने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीत पंतने नाबाद ८९ धावा केल्या ज्याने भारताने ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा मालिका विजय मिळवला. वाचा- पंतला वरच्या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना कोणाची होती यावर संघाचे फलंदाजीचे कोच यांनी सांगितले की, पंतच्या फलंदाजीचा क्रम बदलून त्याला वरच्या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना विराट कोहलीची होती. पहिल्या कसोटीनंतर जेव्हा विराट भारताकडे जाणार होता. तेव्हा त्याने ही आयडिया दिली होती. भारताचा फिरकीपटू आर अश्विनसोबत युट्यूब चॅनलवर बोलताना राठोड यांनी या गोष्टीचा खुलासा केला. हा निर्णय माझा नव्हता. त्यामुळे त्याचे क्रेडिट मी घेऊ शकत नाही. याची सुरुवात पहिल्या कसोटीनंतर झाली. श्रीधरने यासंदर्भात विराट आणि अजिंक्यशी चर्चा केली. विराट जाण्याआधी आम्ही त्यावर चर्चा केली. आम्ही जेव्हा चर्चा करत होते तेव्हा विराटने ही आयडिया दिली होती. वाचा- जर आम्ही दोन्ही डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसह खेळलो तर फायदा होईल. त्यामुळे पंतला ५व्या क्रमांकावर पाठवले गेले. जर विकेट लवकर पडल्या तर पंतला वरच्या क्रमांकावर पाठवले जावे. सुरुवातीला असा निर्णय झाला की तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला जाईल. पण सिडनी कसोटीत दुसऱ्या डावात मला वाटले की विकेट पडली किंवा नाही तरी ही योग्य वेळ आहे त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची आणि धावा करण्याची. वाचा- रवी शास्त्री हे देखील लेफ्ट आणि राइट कॉम्बिनेशनवर विश्वास ठेवतात. यावर चर्चा झाल्यावर रहाणेने देखील सहमती दर्शवली. गाबा कसोटीत पंतला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची इच्छा होती. पण तसे झाले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oiHoKP

माझे रेकॉर्ड चांगले, आता वनडे संघातून खेळायचे आहे-अजिंक्य रहाणे

मुंबई: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून देणारा आणि आतापर्यंत कसोटीत कधीही पराभव न झालेला अजिंक्य रहाणेचे लक्ष्य आता टीम इंडियाच्या वनडे संघात प्रवेश करण्याचे आहे. अजिंक्य मोठ्या कालावधीपासून वनडे संघातून बाहेर आहे. पण कसोटी संघात त्याला उपकर्णधार म्हणून संधी दिली जाते. एका मुलाखतीत अजिंक्यने वनडे संघात खेळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले, सध्या तरी माझे लक्ष कसोटी संघावर आहे. वनडेत माझे रेकॉर्ड चांगले आहे. चांगली कामगिरी करून वनडेत स्वत:ची जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेन. अजिंक्यने भारताकडून १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये अखेरची वनडे खेळील होती. त्याने ९० वनडे खेळल्या आहेत. पण अद्यापही त्याचा वनडेसाठी विचार केला जात नाही. वाचा- वनडेत अजिंक्यच्या नावावर ९० सामन्यातील ८७ डावात ३५ हून अधिक सरासरीने २ हजार ९६२ धावा आहेत. ज्यात ३ शतक आणि २४ अर्धशतकाचा समावेश आहे. वनडेत त्याचा स्ट्राइकरेट ८०च्या जवळ आहे. त्याने २०११ साली वनडेत टीम इंडियाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर तो बराच काळ वनडे संघात होता. पण नंतर विराट कोहलीने त्याच्याकडे फक्त सलामीवीर म्हणून पाहिले आणि संघातून वगळले. अजिंक्यच्या मते तो वनडे संघात मधळ्या फळीत फलंदाजी करू शकतो. वाचा- ... भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने ज्या देशात कसोटी क्रिकेट पाहण्यासाठी लोक येत नाहीत तेथे आता प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतील. कसोटी क्रिकेटमध्ये देखील अखेरच्या तासापर्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. सामने ड्रॉ होण्याची संख्या कमी झाली आहे आणि निकाल लागत आहेत. खेळाडू आयपीएल खेळून येतात आणि कसोटीत विजय मिळून जात आहेत. भारतीय संघाने एक बेंचमार्क सेट केला आहे, असे अजिंक्य म्हणाला. आमचे महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असताना ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. कसोटी क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करू. २०१६ साली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात मी मैदान भरलेले पाहिले होते. इंग्लंडमध्ये देखील कसोटीसाठी प्रेक्षक असतात. वाचा- भारताच्या राखीव खेळाडूंबद्दल बोलताना तो म्हणाला, यात कोणतीच शंका नही ही आमच्या राखीव खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. शुभमन गिलने आयपीएलमध्ये धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कसोटीत कोणत्याही दबावाशिवाय फलंदाजी केली. मोहम्मद सिराज हा मालिकेच्या अखेरच्या सामन्यात मुख्य गोलंदाज होता. या सर्व खेळाडूंनी भारताच्या अ दौऱ्यात अनुभव मिळवला होता. त्यामुळे पहिल्या आंतरराष्ट्रीय लढतीचा दबाव घेतला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MtWEYc

Monday, January 25, 2021

विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, टी. नटराजनने केला खुलासा...

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन हा ऑस्ट्रेलियामध्ये फक्त नेट बॉलर म्हणून गेला होता. पण ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये नटराजनने आपले पदार्पण केले आणि एक इतिहासच रचला. पण नटराजनने आता भारताचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक खुलासा केला आहे. कोहलीच्या एका निर्णयामुळे आपल्या डोळ्यात पाणी आले, असे नटराजने यावेळी म्हटले आहे. नटराजनने भारतामध्ये दाखल झाल्यावर पत्रकारांना सांगितले की, " ऑस्ट्रेलियामध्ये मला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. कारण ऑस्ट्रेलियामध्ये मी फक्त सराव गोलंदाज म्हणून गेलो होतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये मला खेळण्याची संधी मिळेल, असे कधीच वाटले नव्हते. पण जेव्हा मला समजले की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मला मिळत आहे, तेव्हा मी अधिक दडपणाखाली आलो होतो. पण त्याचवेळी माझे भारतासाठी खेळण्याचे स्वप्नही साकार होत होते." भारताला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पराभव स्विकारावा लागला. पण त्यानंतर झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताला विजय मिळाला होता. नटराजनला यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही पदार्पण करण्याची संधी दिली होती. नटराजनने या मालिकेत कमाल केली. त्यामुळे मालिका विजयानंतर हार्दिक पंड्याला मिळालेला पुरस्कार त्याने नटराजनला दिला होता. नटराजनने पुढे सांगितले की, " आम्ही ट्वेन्टी-२० मालिका जिंकलो होतो. त्यांनतर कर्णधार विराट कोहलीने मालिका विजयाचा चषक माझ्या हातामध्ये दिला होता. त्यावेळी माझे डोळे पाणावले होते. मी त्यावेळी भावुक झालो होतो. कारण माझ्यासारख्या नवख्या खेळाडूच्या हातामध्ये कर्णधाराने जेतेपदाचा चषक दिला होता. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय असाच क्षण होता. कारण जेतेपदाचा चषक माझ्या हातामध्ये होता." नटराजनने यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये एकच धमाल उडवून दिली. कारण ट्वेन्टी-२० मालिकेत नटराजनने भन्नाट कामगिरी केली होती. नटराजनच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी ठरताना दिसत होते. त्याचबरोबर कसोटी मालिकेतही नटराजनने दमदार कामगिरी केली. अखेरच्या कसोटीमध्येही नटराजनने अचूक गोलंदाजी करून संघाला महत्वाचे विकेट्स मिळवून दिले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3phBfzD

महेंद्रसिंग धोनीच्या नव्या लुकची आहे सर्वत्रच चर्चा, फोटो झाला व्हायरल...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या नवीन लुकमुळे सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आला आहे. धोनीने आपला लुक बदलला आहे. धोनीच्या या नवीन लुकचा फोटो आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. धोनी क्रिकेट विश्वात जसा आपल्या नेतृत्वामुळे प्रसिद्ध आहे, तसाच तो आपल्या नवीन लुकसाठीही असतो. गेल्या वर्षभारता धोनीचे बरेच लुक पाहायला मिळाले. पण धोनीचा सध्याचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच धोनीच्या नव्या लुकचे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच दिवसांनी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कारण या फोटोमध्ये धोनीचे केस पांढरे झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर धोनी आता म्हातारा झाला, अशी प्रतिक्रीयाही काही जणांनी दिली होती. पण धोनीचा सध्याच्या लुक हा भन्नाट आहे. धोनीने आपली हेअरस्टाइल यावेळी बदलेली आहे. त्यामुळे धोनी अधिक फ्रेश आणि यंग दिसत आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या ढंगात परतल्याचे चाहत्यांना वाटत आहे. लॉकडाऊनमधील धोनीचा लुक चाहत्यांना पसंत पडला नव्हता. त्यानंतर आयपीएल खेळत असतानाही धोनीचा एक वेगळा लुक पाहायला मिळाला होता. पण तोदेखील चाहत्यांना फारसा रुचलेला नव्हता. पण सध्याच्या घडीला धोनीने जो आपला लुक बदलला आहे, त्यामुळे तो गेल्या वर्षभरापेक्षा वेगळाच दिसत आहे. त्यामुळेच हा लुक चाहत्यांना पसंत पडलेला आहे. काही दिवसांतच आयपीएलचा लिलाव होणार आहे. या लिलावात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ कोणत्या खेळाडूंना संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण काही दिवसांपूर्वीच चेन्नईच्या संघाने केदार जाधव, हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय यांनी सोडचिठ्ठी दिली होती, तर सुरेश रैनाला संघात कायम ठेवले होते. त्यामुळे यापुढे चेन्नईच्या संघात नेमके कोणते बदल होणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे चेन्नईचा नवीन संघ पाहण्यासाठी चाहते आताा आतुर झाले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pihZSS

'भारत जिंकल्यावर त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला आपण जिंकलो...'

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात मिळवलेला विजय हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम विजय होता यात कोणाच्याही मनात शंका नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत चॅनल ७ कडून सुनिल गावस्कर समालोचन करत होते. वाचा- भारतीय संघाने मालिका विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज याने काय प्रतिक्रिया दिली हे गावस्कर यांनी सांगितले. चॅनल ७ द्वारे आयोजित पार्टीमध्ये लारा माझ्या जवळ आला आणि तो मोठ्याने आपण जिंकला, आपण जिंकलो असे म्हणू लागला. काय शानदार मालिका होती. वाचा- एका मुलाखतीत गावस्कर यांनी लाराला भारतीय संघाच्या विजयाबद्दल किती आनंद झाला होता हे सांगितले. भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाच्या आठवणींसह मी आयुष्यभर आनंदी राहीन. मला आता चंद्रावर असल्यासारखे वाटते, असे लारा त्यांना म्हणाला. लाराच्या या प्रतिक्रियेवरून ही मालिका किती रोमांचक होती याचा अंदाज येतो. वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडू देखील भारताला विजय मिळावा असे वाटत होते. वाचा- भारतीय संघाने मिळवलेला हा विजय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम मालिका विजय आहे यात दुमत असण्याचे कारण नाही असे गावस्कर म्हणाले. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/367odgI

ऑस्ट्रेलिया संघासोबत लिफ्टमध्ये प्रवेश दिला नाही; भारतीय गोलंदाजाने केला धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याची घटना सर्वांना माहिती आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना वर्षद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले होते. पण त्या शिवाय देखील अनेक वाइट अनुभव भारतीय खेळाडूंना आले आहे. असाच एक अनुभव फिरकीपटू ( )ने शेअर केला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत अश्विनला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत लिफ्टमध्ये प्रवेश दिला नाही. हा खुलासा त्याने भारतीय संघाचे कोच आर श्रीधर यांच्यासोबत युट्यूब चॅनलवरील चर्चेत केला. वाचा- सिडनीत पोहचल्यानंतर आम्हाला कठोर नियमांसह बंद करण्यात आले. याच ठिकाणी एक अजब घटना घडली. दोन्ही संघातील खेळाडू बायो बबलमध्ये होते. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लिफ्टमध्ये असत तेव्हा भारतीय खेळाडूंना लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. वाचा- ही घटना जेव्हा घडली तेव्हा खुप वाइट वाटले. आम्ही एकाच बायो बबलमध्ये होतो. तुम्ही एकाच लिफ्टमध्ये आम्हाला जाऊ देत नाही. जे खेळाडू एकाच सुरक्षित जैव वातावरणात आहेत. ही गोष्ट पचवणे फार अवघड होते आमच्यासाठी असे अश्विनने सांगितले. अगदी प्रामाणीकपणे सांगायचे झाले तर तेव्हा खुप वाईट वाटले. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यातील ३ सामन्यात अश्विन खेळू शकला. त्याने १२ विकेट घेतल्या. सिडनी कसोटीत त्याने हनुमा विहारी सोबत शानदार भागिदारी करत पराभव टाळला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iRNCQQ

धक्कादायक... एकाच चेंडूंवर दोनदा रनआऊट झाला एकच फलंदाज, व्हिडीओ झाला व्हायरल

ब्रिस्बेन : आतापर्यंत तुम्ही बरेच रनआऊट क्रिकेटमध्ये पाहिले असतील, पण एकाच चेंडूवर एकच फलंदाज चक्क दोनवेळा रनआऊट झाल्याचे तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल. पण अशीच एक घटना घडली असून या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सध्याच्या घडीला बिग बॅश लीग सुरु आहे. या लीगमध्ये रविवारी सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स या दोन संघांतील सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. यावेळी स्ट्रायकर्सचा संघ फलंदाजी करत होता. यावेळी स्ट्रायकर्स संघाचा जॅक वेथराल्ड हा फलंदाज एकाच चेंडूवर दोनदा रनआऊट झाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय, पाहा... स्ट्रायकर्सचा संघ फलंदाजी करत असताना १० षटकात ही गोष्ट घडली. नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्ट्रायकर्सच्या एका फलंदाजाने फटका मारला. त्यावेळी जॅक हा दुसऱ्या बाजूला उभा होता. हा मारलेला चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागला आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्यावेळी जॅक हा तिथेच उभा होता. पण त्यावेळी तो बाद आहे की नाही, याचा निर्णय झाला नव्हता. त्यानंतर हा चेंडू स्टम्पला लागला आणि पुढे गेला. त्यामुळे स्ट्रायकर्सच्या फलंदाजांनी यावेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जॅक हा धाव घेण्यासाठी धवत गेला होता. पण जॅक धावत असताना चेंडू एका क्षेत्ररक्षकाने अडवला आणि त्याच्या दिशेने फेकला. त्यावेळी यष्टीरक्षकाने हा चेंडू टिपला आणि पुन्हा एकदा जॅकला रनआऊट करण्याचा प्रयत्न केला. जॅक आऊट आहे की नाही, हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला. यावेळी जॅक जिथे पहिल्यांदा उभा होता आणि त्याला रनआऊट करण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर जॅक हा धाव घेण्यासाठी सरसावला. त्यावेळी यष्टीरक्षकाने जॅकला रनआऊट केले होते. त्यावेळीही जॅक रन आऊट असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच जॅक हा एकाच चेंडूमध्ये दोनदा रनआऊट झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YbXIlY

फक्त एका फोटोमुळे शिखर धवन येऊ शकतो गोत्यात, पाहा नेमकं काय घडलं....

नव दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अडचणींमध्ये आता वाढ होऊ शकते, असे दिसत आहे. यासाठी निमित्त ठरला आहे तो एक फोटो. धवनने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे धवन आता गोत्यात येऊ शकतो, असे दिसत आहे. धवनने काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये धवन एका बोटीमध्ये बसला आहे. या बोटीमध्ये बसला असताना धवनच्या जवळ एक पक्षी आला आणि हा फोटो क्लिक करण्यात आला. हा फोटो धवनने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यानंतर वाद-विवादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला देशभरात बर्ड-फ्ल्यू चे संकट आहे. त्यामध्ये धवनने एका पक्षाबरोबरचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता धवनला जो बोटचालक घेऊन गेला होता त्याच्यावर आता उत्तर प्रदेश सरकार कारवाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण देशभरात असे संकट असताना अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता धवनला जो बोटचालक नदीमध्ये घेऊन गेला होता त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. त्यानंतर आता धवनवर कोणती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. धवन सध्याच्या घडीला भारतामध्ये सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करत आहे. पण विश्रांतीच्या काळात धवन हा उत्तर प्रदेशमध्ये गेला होता. यावेळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी धवन उत्तर प्रदेशमधील एका नदीत विहार करत होता. त्यावेळी काही पक्षी धवनच्या जवळ आले होते आणि त्याचे काही फोटो धवनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोंमुळे आता धवनवर कारवाई होऊ शकते, असे संकेत मिळत आहे. आता धवनला घेऊन जाणाऱ्या बोटचालकावर कारवाई होणार असल्याचे दिसत आहे. त्यानंतर धवनची चौकशी होणार का आणि त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे धवनसाठी येणारा कळ हा खडतर असू शकतो, असे म्हटले जात आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c6PaVx

IPL लीलावासाठी श्रीसंत नाव नोंदवणार; पण...

नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंत (S. Sreesanth)ने सात वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा कमबॅक केले. बीसीसीआयद्वारे आयोजित सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत तो केरळ संघाकडून खेळला. देशांतर्गत किकेट खेळल्यानंतर आता तो खेळण्याचा विचार करतोय. पुढील महिन्यात १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात सहभागी होण्यासाठी त्याने तयारी केली आहे. वाचा- आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळण्यासाठी असलेला आवश्यक फिटनेस आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टी त्याने दाखवल्या आहेत. श्रीसंतसाठी एक गट मोठा उत्साही आहे. त्याच बरोबर राज्य क्रिकेट संघटना देखील त्याला पाठिंबा देत आहे. वाचा- वाचा- श्रीसंतने मुश्ताक अली ट्रॉफीतील ५ सामन्यात १८ षटके टाकली. यात ९.८८च्या सरासरीने त्याने १७८ धावा दिल्या. गोलंदाज म्हणून तो महाग ठरला असला तरी चार विकेट घेतल्या आहेत. स्पर्धेत त्याने आक्रमक गोलंदाजी केली. आता आयपीएलच्या लिलावात भाग घेण्यास श्रीसंत उत्सुक आहे. पण प्रश्न असा आहे की त्याला खरेदी कोण करणार. वाचा- वाचा- लिलावात एकापेक्षा एक जलद गोलंदाज असताना २०१३ साली स्पॉट फिक्सिंगमुळे सात वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागणाऱ्या श्री संतवर कोणता संघ विश्वास दाखवणार हा मोठा प्रश्न आहे. लिलावात तुम्ही किती मोठे खेळाडू आहात, तुमचा इतिहास काय आहे या गोष्टींना महत्त्व नसते. श्रीसंतच्या चाहत्यांची मात्र इच्छा आहे की त्याने आयपीएल खेळावे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39fUsw5

IND vs ENG : भारतीय संघाला धोक्याचा इशारा, इंग्लंडने श्रीलंकेला केलं चारी मुंड्या चीत

नवी दिल्ली : भारतामध्ये दाखल होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाने एक धोक्याचा इशारा दिला आहे. इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच माती चारी मुंड्या चीत करत कसोटी मालिका २-० अशी जिंकलेली आहे. त्यामुळे इंग्लंडने मालिकेपूर्वीच भारतीय संघाला धोक्याचा इशाला दिल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी १६४ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यानंतर इंग्लंडला एकामागून एक चार धक्के बसत गेले. त्यामुळे या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ४ बाद ८९ अशी अवस्था झाली होती. त्यामुळे आता कोणता संघ हा सामना जिंकणार, याची उत्सुकता टिपेला गेली होती. कारण पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यामुळे ही कसोटी जिंकत श्रीलंकेला मालिका १-१ अशी बरोबरीत करण्याची संधी होती. इंग्लंडची ४ बाद ८९ अशी अवस्था असताना सलामीवीर टॉम सिब्ली आणि जोस बटलर यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. टॉमने यावेळी नाबाद ५६ धावांची खेळी साकारली, तर बटलरने नाबाद ४६ धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिला. इंग्लंडने हा सामना सहा विकेट्स राखून जिंकला आणि मालिका २-० अशी खिशात टाकली. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रुटने कमालच केली. गॉल येथे सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात रुटने श्रीलंकेचे दोन विकेट्स पटकावले. पण हे दोन विकेट्स मिळवताना रुटने एकही धाव दिली नाही. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. पण त्याचबरोबर रुटने या सामन्यात दमदार फलंदाजी केल्याचेही पाहायला मिळाले. रुटच्या दमदार फलंदाजीमुळेच इंग्लंडवर फॉलोऑनची वेळ आली नाही. पण जर रुटने ही खेळी साकारली नसती तर नक्कीच इंग्लंडवर फॉलोऑन आला असता. त्यामुळे या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात रुटची कामगिरी भन्नाट अशीच झाली आहे. या दुसऱ्या सामन्यात रुटने १.५ षटके गोलंदाजी केली. यामधील एक षटक निर्धाव टाकले, त्याचबरोबर त्याच्या या ११ चेंडूंमध्ये एकही धाव घेतली गेली नाही. पण रुटने यावेळी श्रीलंकेच्या लसिथ एमबुलडेनियाला जॉनी बेअरस्टोव्हकरवी झेलबाद केले. त्यानंतर रुटने श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोला क्लीन बोल्ड करत आपली दुसरी विकेट मिळवली. पण या दोन्ही विकेट्स मिळवताना रुटने एकही धाव दिली नाही आणि आतापर्यंत अशी कामगिरी क्रिकेट विश्वात कोणालाही करता आली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3okbhua

कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षात प्रथमच असे घडले; इंग्लंडने केला विक्रम

नवी दिल्ली: श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात अशी एक घटना घडली आहे जी यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये कधीच घडली नव्हती. गॉल मध्ये सुरू असलेल्या या सामन्यातील दोन्ही डावात श्रीलंकेचा क्रिकेट संघ खास पद्धतीने ऑलआउट झाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात श्रीलंकेने ३८१ तर दुसऱ्या डावात १२६ धावा केल्या. वाचा- कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की एखाद्या संघाच्या सर्व विकेट एकाच पद्धतीच्या गोलंदाजांनी घेतल्या. इंग्लंडच्या जलद गोलंदाजांनी पहिल्या डावात लंकेचा डावा संपुष्ठात आणला. तर दुसऱ्या डावात सर्व विकेट फिरकीपटूंनी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अशी घटना याआधी कधीच घडली नव्हती. वाचा- पहिल्या डावात ३८ वर्षीय जेम्स एडरसनने ६ विकेट घेतल्या. कसोटी एका डावात ५ विकेट घेणारा तो जगातील सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे. त्याने २९ ओव्हरमध्ये ४० धावा देत ६ विकेट घेतल्या. या शिवाय मार्क वुडने ३ आणि सॅम करनने एक विकेट घेतली. या तीन गोलंदाजांनी लंकेचा डाव संपुष्ठात आणला. वाचा- लंकेच्या दुसऱ्या डावात डॉम बेस आणि जॅक लीच यांनी यजमान संघाला १२६ धावात गुंडाळले. बेसने १६ षटकात ४९ धावा देत ४ तर लीचने १४ षटकात ५९ धावा देत चार विकेट घेतल्या. दोन विकेट जो रुटने घेतल्या. दुसऱ्या डावातील सर्व विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. वाचा- १४५ वर्षात प्रथमच असे घडले कसोटी क्रिकेटची सुरुवात १८७६ साली झाली. त्यानंतर प्रथमच असे झाले की एका प्रकारच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YbCVyW

बायकोसमोर आल्यावर नवरा पळतच सुटला, वीरेंद्र सेहवागने पोस्ट केलेला झिंगाट व्हिडीओ व्हायरल...

नवी दिल्ली : भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या पोस्ट या चांगल्याच मजेदार आणि रंजक असतात. आता सेहवागने असा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे की, त्यामध्ये नवरा आपल्या बायकोला कसा आणि किती घाबरतो, हे दाखवण्यात आले आहे. सेहवागचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेहवागने शेअर केलेला व्हिडीओ हा एका पार्टीमध्ये आहे. उतार वयातही माणसांमध्ये किती जोश असतो, हे या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीकडे पाहून दिसत आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक म्हातारा इसम भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या वयातही तरुणांना लाजवेल, असा डान्स ही व्यक्ती करत आहे. पण ही व्यक्ती डान्स करत असाना तिथे त्याची बायको येथे आणि त्यानंतर नेमकं काय होतं, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या पार्टीमध्ये बायकोची एंट्री झाल्यावर त्या म्हाताऱ्या व्यक्तीने धुम ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या व्यक्तीचा बायको थेट काठी घेऊनच या पार्टीमध्ये घुसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्या म्हातारा व्यक्ती तिथून पळून गेल्याचे पाहायला मिळत आहे. सेहवागने या व्हिडीओखाली काही ओळीही लिहल्या आहे. या व्हिडीओखाली सेहवागने लिहिले आहे की, वय हे शाश्वत नसंत, पण बायकोची काठी मात्र शाश्वत असते. सेहवागचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच पसंतीस उतरलेला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LVe6VA

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...