सध्याच्या घडीला भारत २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. पण भारताचा क्रिकेट संघ मात्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. संपूर्ण भारत लॉकडाऊन असतानाही विराट ब्रिगेड सराव करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला भारतीय खेळाडू आपल्या घरीच आहेत. आपल्या कुटुंबियाबरोबर ते वेळ व्यतित करत आहेत. पण तरीही त्यांनी सराव सोडलेला नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांनी काही गोष्टी करायला हव्यात, असे संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना सांगितले असल्याचे समजते आहे. भारतीय संघातील सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला खेळाडू घरीच आहेत. पण फिजिओ नितीन पटेल आणि कंडिशनिंग कोच निक वेब यांनी मात्र खेळाडूंना काही गोष्टी तंदुरुस्ती राखण्यासाठी करण्यास सांगितले आहे. जो खेळाडू भारतासाठी कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळतो, त्या खेळाडूला या गोष्टी करणे अनिर्वाय आहे. प्रत्येक खेळाडूला वेगवेगळा व्यायाम सांगण्यात आला आहे. गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, यष्टीरक्षक या सर्वांना वेगवेगळे व्यायाम प्रकार देण्यात आले आहेत आणि त्यानुसार त्यांनी व्यायाम करायचा आहे." सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे भारतात चिंतेचे वातावरण आहे. सध्याच्या घडीला भारत २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे जवळपास सर्वच जणं घरी बसलेले आहेत. बीसीसीआयला दक्षिण आफ्रिकेबरोबरची वनडे मालिका रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर आता आयपीएलही त्यांना पुढे ढकलावे लागले आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू मैदानात येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्याच घरी ठेवून फिट ठेवण्याचे काम संघ व्यवस्थापन करताना दिसत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JeZf3m
No comments:
Post a Comment