Ads

Monday, March 23, 2020

क्रिकेटमधील हा रेकॉर्ड ४२ वर्ष भारतीयाच्या नावावर होता!

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यातील काही विक्रम हे अनेक वर्ष त्यांच्याच नावावर होते. असाच एक अनोखा विक्रम एका भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर तब्बल ४२ वर्ष होता. १९६२ साली भारतीय क्रिकेटपटूने केलेला विक्रम मोडण्यासाठी २००४ हे साल उजडावे लागले. भारतीय क्रिकेट संघात टायगर पटौदी नावाने लोकप्रिय असलेले यांनी ५८ वर्षांपूर्वी म्हणजे २३ मार्च १९६२ रोजी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. हा विक्रम अनेक वर्ष त्यांच्या नावावर राहिला. याच दिवशी त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते आणि जागतिक क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार होण्याचा विक्रम पटौदी यांच्या नावावर झाला. वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिजटाऊन येथे २३ मार्च १९६२ रोजी सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पटौदी यांनी कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली होती. तेव्हा त्यांचे वय फक्त २१ वर्ष ७७ दिवस इतके होते. जागतिक क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला होता. पटौदी यांच्या नावावर हा विक्रम ४२ वर्ष होता. २००४ मध्ये झिम्बाब्वेच्या ततेंदा ताईबूने मोडला. त्याने २० वर्ष ३५८ व्या दिवशी कर्णधारपद स्विकारले होते. ताईबूच्या नावावर हा विक्रम १५ वर्ष राहिला. त्याचा विक्रम गेल्या वर्षी अफगाणिस्तानच्या राशिद खान याने मोडला. खान याने २० वर्ष ३५० व्या दिवशी कर्णधारपद स्विकारले. वाचा- जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात तरुण कर्णधार म्हणून पटौदी तिसऱ्या क्रमांकावर असले तरी भारतीय क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार म्हणून पटौदी यांच्या नावावरच विक्रम आहे. १९६२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हा पटौदी कर्णधार नव्हते. ते संघाचे उपकर्णधार होते आणि कर्णधारपदाची जबाबदारी नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे होती. तेव्हा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या जलद गोलंदाजांचा दबदबा होता. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. तिसरा कसोटी सामना २३ मार्चापासून ब्रिजटाऊन येथे होणार होता. त्याआधी १६ मार्चपासून त्याच मैदानावर बारबाडोस संघाविरुद्ध चार दिवसांचा अभ्यास सामना झाला. या सामन्यात चार्ली ग्रिफिथचा चेंडू कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला लागला. यात कॉन्ट्रॅक्टर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाली. या घटनेमुळे कॉन्ट्रॅक्टर यांचे क्रिकेट करिअर संपले. कॉन्ट्रॅक्टर यांच्या जागी २३ मार्चपासून होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी पटौदी यांची निवड करण्यात आली. विशेष म्हमजे पटौदी यांचा हा करिअरमधील चौथा कसोटी सामना होता. भारताने मालिकेतील पुढील दोन्ही सामने हारले. पण या घटनेमुळे भारतीय क्रिकेटमधील पटौदी युगाची सुरूवात झाली. त्यानंतर १९७३ या वर्षाचा अपवाद वगळता पटौदी खेळले ते कर्णधार म्हणूनच... १९७३ मध्ये पटौदी यांनी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामने खेळले होते. पटौदी यांनी त्यांच्या करिअरमधील अखेरची कसोटी कर्णधार म्हणूनच खेळली होती. त्यांनी भारताकडून ४६ कसोटी सामने खेळले त्यापैकी ४० सामन्यात ते कर्णधार होते. पटौदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा ९ सामन्यात विजय, १९ मध्ये पराभव झाला. तर १२ सामने ड्रॉ झाले. रेकॉर्ड पाहता पटौदी यांची कामगिरी फार यशस्वी नसली तरी आक्रमकपणामुळे त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. अशीच लोकप्रियता नंतर सौरव गांगुलीला कर्णधार असताना मिळाली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2vHbjqK

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...