हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दोन धक्के बसले. प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावांचा डोंगर उभा करून देखील भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर आयसीसीच्या कारवाईला भारतीय संघाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे न्यूझीलंड दौऱ्यात तिसऱ्यांदा आयसीसीने भारतीय संघावर कारवाई केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरने १०३ धावांची शतकी खेळी केली तर लोकेश राहुलने नाबाद ८८ आणि कर्णधार विराट कोहलीने ५१ धावा केल्या. भारताने ४ बाद ३४७ धावा केल्यानंतर न्यूझीलंडने ११ चेंडू आणि ६ गडी राखून विजय मिळवला. वाचा- पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड केला आहे. यावेळी आयसीसीने भारतीय संघाला सामन्यातील मानधनाच्या ८० टक्के इतका दंड केला आहे. न्यूझीलंड दौऱ्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल भारतीय संघाला दंड होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी टी-२० मालिकेत दोन वेळा भारतीय संघाला याच कारणासाठी दंड झाला होता. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय संघाला निश्चित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल दंड केला. भारतीय संघाने नियमीत वेळेपेक्षा चार षटके अधिक वेळ घेतला. आयसीसीचा नियम २.२२ नुसार निश्चित वेळेनंतर जितकी षटके टाकली जातात अशा प्रत्येक ओव्हरसाठी २० टक्के दंड केला जातो. वाचा- टी-२० मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात भारतीय संघाला अनुक्रमे ४० आणि २० टक्के इतका दंड करण्यात आला होता. पहिल्या वनडेत धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दलची चूक कर्णधार विराट कोहलीने मान्य केली असून याप्रकरणाची सुनावणी होणार नसल्याचे आयसीसीने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39iieVH
No comments:
Post a Comment