Ads

Monday, February 3, 2020

भारत आणि फायनलमध्ये पाकिस्तान; जाणून घ्या रेकॉर्ड

पोटशेफस्ट्रूम : आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारीक संघांमध्ये ही लढत होत असल्यामुळे सेमीफायनल सामन्याला फायनलचे स्वरूप आले आहे. दोन्ही देशातील राजकीय तणावामुळे द्विपक्षीय क्रिकेट बंद आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धेत होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये याआधी खेळल्या गेलेल्या तीन लढतीत भारताने विजय मिळवला आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बाब म्हणावी लागले. विशेष म्हणजे गेल्या वर्ल्ड कपमध्ये देखील हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये लढले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर स्पर्धेचे जेतेपद मिळवले. वाचा- स्पर्धेत या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताचा यशस्वी जैस्वाल शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ३ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला अथर्व अंकोलेकर, रवी बिश्नोई आणि सिद्धेश वीर यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. कार्तिक त्यागीने उपांत्या पूर्व फेरीत चार विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानचा विचार केल्यास मोहम्मद हुरैरा, हैदर अली, फहद मुनीर आणि मोहम्मद हॅरिस यांनी चांगली फलंदाजी केली आहे. वाचा- भारताचा आतापर्यंतचा वर्ल्ड कपमधील प्रवासश्रीलंकाविरुद्ध ९० धावांनी विजय जपान विरुद्ध १० विकेटनी विजय न्यूझीलंडविरुद्ध ४४ धावांनी विजय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांनी विजय पाकिस्तानचा आतापर्यंतचा वर्ल्ड कपमधील प्रवास स्कॉटलंडविरुद्ध ७ विकेटनी विजय झिम्बाब्वेविरुद्ध ३८ धावांनी विजय बांगलादेशविरुद्ध पावसामुळे सामना रद्द अफगाणिस्तानविरुद्ध ६ विकेटनी विजय वाचा- १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमधील भारत-पाक लढती या दोन्ही संघात आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये ९ लढती झाल्या आहेत. त्यापैकी पाच लढती पाकने तर चार लढती भारताने जिंकल्या आहेत. १९८८-पाकिस्तानचा ६८ धावांनी विजय १९९८-भारताचा ५ विकेटनी विजय २००२- पकिस्तानचा २ विकेटनी विजय २००४- (सेमीफायनल) पाकिस्तानचा ५ विकेटनी विजय २००६- (फायनल) पाकिस्तानचा ३८ धावांनी विजय २०१०- (उपांत्य पूर्व) पाकिस्तानचा २ विकेटनी विजय २०१२- (उपांत्य पूर्व) भारताचा १ विकेटनी विजय २०१४- भारताचा ४० धावांनी विजय २०१८- भारताचा २०३ धावांनी विजय वर्ल्ड कपचे विजेतेपद- भारत चार वेळा- २०००, २००८, २०१२ आणि २०१८ पाकिस्तान दोन वेळा- २००४ आणि २००६


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bbnVpR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...