Ads

Tuesday, February 4, 2020

भारताचा धावांचा डोंगर; किवींपुढं ३४८ धावांचं आव्हान

हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतानं न्यूझीलंडपुढं धावांचा डोंगर उभारला आहे. यांचं वेगवान शतक व कर्णधार विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं ५० षटकांत ३४७ धावांपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी न्यूझीलंडपुढं आता ३४८ धावांचं आव्हान आहे. पाहा: वाचा: हॅमिल्टनमधील सेडन पार्कवर हा सामना होत आहे. टी-ट्वेंटीमध्ये भारताकडून दारुण पराभव झालेल्या न्यूझीलंड आज तयारीनिशी मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचे सलामीवीर पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल हे स्वस्तात माघारी परतले. पृथ्वीनं २० धावा केल्या तर, मयांक अग्रवाल ३२ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीनं अधिक पडझड होऊ दिली नाही. विकेट टिकवतानाच दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत धावांची गती उत्तम राखली. विराट ६३ चेंडूत ५१ धावा कुटल्या. त्यानं एकदिवसीय कारकिर्दीतलं ५८ वं अर्धशतक झळकावलं. तर, श्रेयस अय्यरनं १०३ धावा ठोकत एकदिवसीय मालिकेतील पहिलं शतक साकारलं. विराट बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं त्याला उत्तम साथ दिली. लोकेशनं अवघ्या ६४ चेंडूत झटपट ८८ धावा केल्या. तो नाबाद राहिला. तर, केदार जाधवनं १५ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. वाचा: वाचा: न्यूझीलंडकडून टीम साउदी यानं दोन गडी बाद केले. तर, कॉलिन ग्रँडहोम व ईश सोढीनं प्रत्येकी एक बळी घेतला. इतर कोणत्याही गोलंदाजाला चमक दाखवता आली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RZVCmS

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...