Ads

Tuesday, November 12, 2019

विशेष: रोहितनं आजच इतिहास रचला होता!

नवी दिल्ली: क्रिकेटच्या इतिहासात १३ नोव्हेंबर ही तारीख खूपच खास आहे. भारतीय क्रिकेट आणि हिटमॅन रोहित शर्मासाठीही हा दिवस विशेष ठरला आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ साली आजच्याच दिवशी रोहितनं श्रीलंकेविरुद्ध इडन गार्डन्समध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी करून इतिहास रचला होता. रोहितचा हा विक्रम आजही कायम आहे. रोहितनं ठोकल्या होत्या २६४ धावा रोहितनं कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर विक्रमी २६४ धावा केल्या होत्या. त्यात ३३ खणखणीत चौकार आणि नऊ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. सर्वाधिक धावांचा हा विक्रम अबाधित आहे. जगातील कोणत्याच फलंदाजाला हा विक्रम आजपर्यंत तरी मोडता आलेला नाही. क्रिकेटच्या जगतात 'हिटमॅन' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या रोहितनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २७ शतके आणि ४२ अर्धशतके ठोकली आहेत. सचिन-सेहवागलाही टाकलं होतं मागे रोहितनं १७३ चेंडूंमध्ये २६४ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकर (नाबाद २००) आणि विरेंद्र सेहवागचा (२१९ धावा) विक्रम मोडला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके रोहितनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके ठोकली आहेत. तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बेंगळुरूमध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा कुटल्या होत्या. तर २०१४ रोजी आजच्या दिवशी त्यानं २६४ धावांची तुफानी खेळी केली होती. तर १३ डिसेंबर २०१७ रोजी मोहालीत श्रीलंकेविरुद्ध त्यानं नाबाद २०८ धावांची खेळी केली होती. आयसीसीनं ऐतिहासिक खेळीला दिला उजाळा आयसीसीनंही रोहितच्या या ऐतिहासिक खेळीचं स्मरण केलं आहे. रोहितचा फोटो ट्विट करून 'आजच्या दिवशी २०१४ रोजी रोहित शर्मानं मोठी खेळी केली होती. भारतीय सलामीवीर रोहितनं २६४ धावा कुटल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. सर्वात वाईट काय घडलं? तर श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी रोहितचा झेल तो चार धावांवर खेळत असताना सोडला,' असं नमूद केलं आहे. चार धावांवर खेळत असताना सुटला होता झेल या सामन्यात श्रीलंकेच्या शामिंडा एरंगाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहितचा झेल सोडला होता. रोहितनं बाहेर जाणारा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो बॅटच्या काठावर लागून थर्ड मॅनच्या दिशेने गेला. तो झेल थिसारा परेराला टिपता आला नाही. डावाच्या शेवटच्या चेंडूवर झाला होता झेलबाद श्रीलंकेविरुद्ध तडकावलेल्या २६४ धावांपैकी १८६ धावा फक्त चौकार आणि षटकारांमधून केल्या होत्या. या डावाच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नुवान कुलसेकरानं त्याला बाद केलं होतं. रोहितच्या या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारतानं ४०४ धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा डाव २५१ धावांवरच आटोपला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QbXgRN

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...