Ads

Wednesday, November 13, 2019

आता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट

इंदूर: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल सध्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असून, त्यानं क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या आयुष्यातील कठीण काळ उलगडला आहे. 'मी सुद्धा अशा कठीण काळातून गेलो आहे. त्यावेळी माझं जग आता संपलं आहे असे विचार मनात आले होते,' असं विराट म्हणाला. क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं सध्या ब्रेक घेतला आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी तो सामना करत आहे. त्यामुळं आता आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इंग्लंडचा स्टीव्ह हार्मिसन, मार्कस ट्रेस्कोथिक आणि ग्रीम फाउलर आदींसारखे खेळाडूही या प्रसंगातून गेले आहेत. याबाबत बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीनंही आपल्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला. 'माझ्या मनातही असे वाईट विचार आले होते. पण त्यावेळी त्यांच्याशी लढायचं कसं हे ठाऊक नव्हतं,' असं तो म्हणाला. बांगलादेश आणि भारत यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीनं माध्यमांशी संवाद साधला. खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत त्यानं आपलं मत मांडलं. यावेळी त्यानं ग्लेन मॅक्सवेलचं कौतुक केलं. मानसिक आरोग्यासंबंधीची बाब स्वीकारणं हे उल्लेखनीय आहे, असं तो म्हणाला. 'जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता. त्यावेळी संघातील प्रत्येक खेळाडूला अशा संवादाची गरज असते, जे त्याला बोलण्यासाठी प्रेरित करतो. ग्लेन मॅक्सवेलनं जे केलं ते उल्लेखनीय आहे असं मला वाटतं, असंही तो म्हणाला. विराटनं यावेळी २०१४ साली झालेल्या इंग्लंड दौऱ्याचा उल्लेख केला. 'मी सुद्धा या कठीण काळातून गेलो आहे. आता सगळं संपलं असं त्यावेळी मला वाटलं होतं. काय करायचं आणि काय बोलायचं हे मला ठाऊक नव्हतं,' असं त्यानं सांगितलं. वैयक्तिक पातळीवर जे काही चाललं आहे, ते समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32LBQ0u

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...