इंदूर: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना इंदूरमध्ये सुरू आहे. सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी केलेल्या ८६ धावांवरून भारतानं दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार लवकरच बाद झाले. पुजारा ५४ धावांवर बाद झाला, तर कर्णधार कोहली शून्यावर बाद झाला. विराट गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. कोहलीला अबु जायेद यानं पायचीत केलं. ३२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विराट बाद झाला. गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच झाला. मायदेशातील मैदानात कसोटीत विराटला खातंही उघडता आलं नाही. श्रीलंकेविरुद्ध २०१७मध्ये कोलकाता कसोटीत विराट शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी श्रीलंकेच्या सुरंगा लकमल यानं विराटला बाद केलं होतं. तिसऱ्यांदा विराट शून्यावर बाद मायदेशातील मैदानावर कसोटी सामन्यात शून्यावर बाद होण्याची विराटची ही तिसरी वेळ आहे. बांगलादेश आणि श्रीलंकेआधी तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१६/१७मध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. पुण्यातील कसोटीत ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क यानं त्याला बाद केलं होतं. रोहित, पुजारानंतर आता विराट, जायेद चमकला इंदूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्याला जायेदनं बाद केलं. रोहित, चेतेश्वर आणि विराट हे तिघेही आघाडीचे फलंदाज बाद झाले. विशेष म्हणजे या तिघांना जायेदनंच तंबूत धाडलं. जायेदचा हा सातवा कसोटी सामना आहे. या तिन्ही दिग्गज फलंदाजांना बाद करणं हे त्याच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33Tiisw
No comments:
Post a Comment