Ads

Tuesday, November 12, 2019

डे-नाइट टेस्ट: सूर्यास्तावेळी अडचणी येतील-पुजारा

बेंगळुरू: भारत आणि बांगलादेश यांच्यात या महिन्याच्या अखेरीस कोलकातामध्ये सामना होणार आहे. मात्र, या सामन्यात सूर्यास्तावेळी दृश्यमानतेची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक आहे, असं मत भारताचा फलंदाज यानं व्यक्त केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. या सामन्यात पहिल्यांदाच गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर २२ नोव्हेंबरपासून डे-नाइट कसोटी सामना सुरू होणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाज डे-नाइट कसोटी खेळणार आहेत. त्यात एसजीच्या गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे. त्यामुळं हा कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. या होऊ घातलेल्या या कसोटीसंदर्भात भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं प्रतिक्रिया दिली आहे. 'मी याआधी दुलीप करंडक स्पर्धेत गुलाबी चेंडूवर खेळलो आहे. तो एक चांगला अनुभव होता. स्थानिक पातळीवर गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव फायदेशीर ठरू शकतो,' असं पुजारा म्हणाला. पुजारासह मयांक अग्रवाल, हनुमा विहारी आणि कुलदीप यादव आदी खेळाडूंना दुलीप करंडकात कुकाबुराच्या गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव आहे. "दिवसा प्रकाशाची समस्या उद्भवणार नाही. मात्र, सूर्यास्तावेळी ही अडचण येऊ शकते. सूर्यास्ताच्या वेळेचे सत्र खूपच महत्वाचे असेल. एक फलंदाज म्हणून मला आलेला अनुभव तर खूपच चांगला आहे. मात्र, अन्य खेळाडूंशी बोललो असता, लेग स्पिनरला खेळणं विशेषतः त्यांच्या गुगलीवर खेळणं कठीण होतं असं त्यांचे म्हणणे आहे," असं पुजारा यानं सांगितलं. सराव महत्वाचा: रहाणे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे यानंही डे-नाइट कसोटीसंदर्भात आपलं मत मांडलं आहे. 'परिस्थितीशी जुळवून घेण्याबाबत म्हणाल तर सामन्याआधी सराव खूपच महत्वाचा आहे,' असं तो म्हणाला. या सामन्याची मला खूपच उत्सुकता लागली आहे. हे एक नवे आव्हान असेल. सध्यातरी पुढे काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. सामना खेळल्यानंतरच समजेल. सामन्याआधी दोन-तीन सराव सत्रांमधून आम्हाला गुलाबी चेंडूबाबत काही गोष्टी समजून घेता येतील. चेंडू किती स्विंग होतो आणि सत्रांनुसार त्यात काय बदल होतो, हे कळेल, असं रहाणे म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34U4yOq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...