Ads

Monday, March 23, 2020

'करोना'मुळे आयसीसीचे मोठे पाऊल

करोना व्हायरसचा प्रसार जगभरात झाला आहे. या गोष्टीचा मोठा फटका क्रीडा जगतालाही बसलेला आहे. आता तर या करोना व्हायरसने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षांनाच घरी बसवल्याचे पाहायला मिळत आहे. करोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची एकदिवसीय सामन्यांची मालिकाही रद्द केली. बऱ्याच देशांनी आपले दौरे रद्द केले आहेत. आता तर करोना व्हायरसटी झळ आयसीसीलाही बसायला सुरु झाल्याचे पाहायला मिळते आहे. करोना व्हायरसचे वाढलेले संकट पाहता आता आयसीसीने आपल्या पदाधिकाऱ्यांना घरूनच काम करायला सांगितले आहे. त्यामुळे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सॉहने हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये यंदाच्या वर्षातील स्पर्धा कधी खेळवायच्या याबाबतचे निर्णय घेणार असल्याचे समजते आहे. बीसीसीआयने यापूर्वीच आपल्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरीन काम करण्याबाबत सांगितले होते. त्याचबरोबर बीसीसीआयची आयपीएलबाबतही एक बैठक झाली होती. यामध्ये करोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल ही २९ मार्चपासून सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे आता आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जर १५ एप्रिलपर्यंत आयपीएल होऊ शकली नाही तर यंदाची स्पर्धा रद्द करावी लागेल, असे म्हटले जात आहे. करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. काही क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत अजूनही कोणता ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही. पण आज जपानच्या पंतप्रधानांनी ऑलिम्पिकबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी सोमवारी ऑलिम्पिकबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ऑलिम्पिक ते म्हणाले की, " ऑलिम्पिक स्पर्धा सध्याच्या घडीला पुढे ढकलणे हे अपरिहार्य वाटत आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WBFdHT

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...