Ads

Thursday, February 6, 2020

मला त्याच्याबद्दल वाईट वाटते; प्रसाद यांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली: गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपसाठी अंबाती रायडूला भारतीय संघातील क्रमांक चारचा खेळाडू म्हणून निवडण्यात येणार होते. रायडू २०१८च्या आशिया कप स्पर्धेपासून भारताचा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून खेळत होता. पण वर्ल्ड कपच्या आधी न्यूझीलंड दौऱ्यात खराब कामगिरीमुळे त्याचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर रायडूने सोशल मीडियावरून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या सर्व घटनेवर तत्कालीन निवड समीतीचे प्रमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाले, मला रायडूसोबत जे झाले त्याबद्दल प्रचंड वाईट वाटते. ती घटना माझ्या मनाला लागली. निवड समितीने २०१६ मधील झिम्बाब्वे दौऱ्यानंतर रायडूचा नेहमीच कसोटी संघासाठी विचार केला होता. यासंदर्भात मी स्वत: त्याच्याशी बोललो होतो. तू कसोटीवर फोकस कर असे सांगितल्याचे, प्रसाद म्हणाले. वाचा- तुम्हाला आठवत असेल तर रायडूच्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर आम्ही त्याला वनडे संघात निवडले होते. ही निवड अनेकांना तेव्हा पटली नव्हती. त्यानंतर आम्ही त्याच्या फिटनेसवर लक्ष दिले. एक महिना तो राष्ट्रीय अकादमीमध्ये होता आणि त्याने फिटनेसमध्ये चांगली सुधारणा केली होती. पण त्याच्या सोबत जे झाले त्याबद्दल मी स्वत: फार दु:खी आहे. वर्ल्ड कप संघात रायडूच्या ऐवजी अष्ठपैलू विजय शंकर याची निवड करण्यात आली होती आणि रायडू हा राखीव खेळाडू असल्याचे सांगण्यात आले. पण राखीव खेळाडू म्हणून देखील त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या रायडूने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. नंतर त्याने निवृत्ती मागे घेतली. वाचा- एकूण ५५ वनडे आंतरराष्ट्रीय खेळला आहे. या सामन्यांत त्याने एकूण १६९४ धावा केल्या आहेत. यामध्ये १० अर्धशतकांचा समावेश आहे. तर, ६ टी-२० सामन्यांत त्याने ४२ धावा केल्या आहेत. रायडू यावेळी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमधून खेळला होता. त्याने एकूण १४७ आयपीएल सामन्यांत ३३०० धावा केल्या आहेत. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2vdnj2v

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...