Ads

Wednesday, February 5, 2020

अजित आगरकरवर लवकरच मोठी जबाबदारी?

मुंबई : क्रिकेट सल्लागार समिती म्हणजेच सीएसी लवकरच बीसीसीआयची राष्ट्रीय निवड समिती नियुक्त करणार आहे. सीएसीमध्ये मदन लाल, आरपी सिंह आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. बीसीसीआयकडे मुख्य निवडकर्ता या पदासाठी अनेक अर्ज आले आहेत. पण यामध्ये पश्चिम किंवा दक्षिणेतील नाव प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, माजी गोलंदाज आणि लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांच्यासह माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया यांनीही अर्ज केला आहे. मध्य भारत विभागातूनही अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्वांमध्ये अजित आगरकरचं नाव रेसमध्ये सर्वात पुढे आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सीएसीला यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. अजित आगरकर यांचं अध्यक्षपद निश्चित मानलं जात आहे, तर शिवरामाकृष्णन दक्षिणेचं प्रतिनिधित्व करतील, असा अंदाज बांधला जात आहे. या सर्व घडामोडींशी संबंधित सूत्राने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या झोनल पॉलिसी नाही हे सत्य आहे. पण राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि रेल्वेशी संबंधित असलेल्या निवडकर्त्यांची आपल्याला गरज नाही का, हे ठरवायचं आहे.’ सीएसीसमोर या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं आव्हान पश्चिम आणि दक्षिण क्षेत्राचा भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच दबदबा राहिला आहे. या दोन्ही विभागांकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं का? विदर्भाने दोन वेळा रणजी आणि इराणी ट्रॉफी जिंकली आहे. या विभागाला जवळून ओळखणाऱ्या कुणाचंही प्रतिनिधित्व नाही. भविष्यात अशीही परिस्थिती येऊ शकते का, जिथे दोन राष्ट्रीय निवडकर्ते फक्त उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधूनही असतील? यामुळे एक नवीन परंपरा सुरू होईल. हा एकाच शहरातील दुसऱ्या निवडकर्त्यासोबत (जतिन परांजपे) न्याय असेल का? बीसीसीआयकडून दक्षिणेकडे दुर्लक्ष करत फक्त मध्य भारतावर लक्ष दिलं जाईल? मध्य भारत विभागावर लक्ष देण्याची मागणी एका अर्जदाराने प्रतिक्रिया दिली की, ‘मोठ्या काळापासून मध्य भागाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मध्य भागात पश्चिम आणि दक्षिणेसारखी मोठी नावं नाहीत हे सत्य आहे. पण हा एक मोठा भाग आहे. किमान एका मुलाखतीसाठी तरी पारदर्शक प्रक्रिया अवलंबली जावी.’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव पाहता अजित आगरकरचं पारडं जड मानलं जात आहे. ‘अजित आगरकरच्या अनुभवाविषयी कोणतीही शंका नाही. त्यांनी क्रिकेट खेळलं आहे, जवळून अनुभवलं आहे. पण सध्या परिस्थिती काय आहे? भारतीय संघात सध्या मुंबईचेच पाच खेळाडू आहेत. दोन निवडकर्ते, ज्यात मुख्य निवडकर्त्याचाही समावेश आहे, तेही मुंबईचेच असतील? बीसीसीआय परांजपे यांचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट का पाहत नाही?’ असा सवाल एका सूत्राने विचारला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/380lxAv

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...