इंदूर: पूर्वी कसोटी सामन्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असायची. अनेक महान फलंदाज आणि गोलंदाजांची जुगलबंदी क्रिकेटच्या मैदानावर पाह्यला मिळायची. आता कसोटी क्रिकेटबाबतची पूर्वी सारखी उत्कंठा क्रिकेटप्रेमींमध्ये राहिलेली नाही. कसोटीमध्ये जागतिक दर्जाचे नसल्याने ही कमतरता जाणवत आहे, असं सांगतानाच वेगवान गोलंदाजांचा दर्जा अजूनही सुधारणं शक्य आहे, असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं. ७०-८०च्या दशकात सुनील गावसकर विरुद्ध अँडी रॉबर्ट्स, डेनिस लिली विरुद्ध इम्रान खान यांची कसोटीतील जुगलबंदी पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असायचे. याशिवाय विरुद्ध वसीम आक्रम किंवा ग्लेन मॅकग्राचा सामना पाहण्यासाठीही क्रिकेटप्रेमींमध्ये उत्कंठा असायची. आता तसं आकर्षण राहिलं नसल्याने सचिनने चिंता व्यक्त केली आहे. कसोटी क्रिकेटचा स्तर खालावला आहे. कसोटी क्रिकेटसाठी हे योग्य नाही. त्यामुळे क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी खेळपट्ट्यांचा दर्जाही सुधारण्याची गरज असल्याचं सचिन म्हणाला. कसोटी क्रिकेटसाठी ज्या पद्धतीने खेळपट्ट्या तयार केल्या जातात. त्यावरही बरचसं अवलंबून असतं. त्यामुळे चांगल्या खेळपट्ट्या तयार केल्यास वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्ससाठी त्याचा फायदाच होईल, असंही त्याने सांगितलं. चांगल्या खेळपट्ट्या दिल्यावर निरस होणार नाही. त्यामुळे सामन्यात रंगत येईल आणि सामने रोमांचक होतील. चांगली फलंदाजीही पाह्यला मिळेल, असंही त्याने स्पष्ट केलं. सचिनने त्याच्या २४ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. अनेक महान गोलंदाजांचा सामना करत सचिनने कसोटीत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या कसोटी क्रिकेटमधील बदलांवर त्याने हे भाष्य केलं आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32NhtjD
No comments:
Post a Comment