Ads

Sunday, February 2, 2020

केएल राहुल ठरला हुकमी एक्का ; विराट, धोनीला टाकेल मागे!

नवी दिल्ली: भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक चर्चा कोणाची झाली असेल तर तो होय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कमाल केली. न्यूझीलंडविरुद्ध पंत उपलब्ध असताना कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर राहुलने जे केले ते सर्वांनी पाहिले. राहुलने केवळ विकेटच्या मागे नाही तर फलंदाज म्हणून सामना जिंकून देण्याची क्षमता सिद्ध करून दाखवली. या कामगिरीमुळे राहुलने भारतीय क्रिकेटमधील एक अनोखा विक्रम देखील केला आहे. असा विक्रम जो चक्क महेंद्र सिंह धोनीला देखील करता आला नाही. वाचा- भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून धोनीचे नाव घेतले जाते. पण ही जबाबदारी पार पाडत असताना धोनीने कधीच टी-२० मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवला नाही. राहुलने त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत शानदार खेळ करत मालिकावीर पुरस्कार मिळवला. राहुला हा भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे ज्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे ही कामगिरी राहुलने परदेशात केली आहे. विराटला मागे टाकले संपूर्ण मालिकेत राहुने कमालीची फलंदाजी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने ५६च्या सरासरीने २२४ धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ५७ ही त्याची सर्वोच्च खेळी होती. याशिवाय यष्टीरक्षक म्हणून देखील त्यांने प्रभावी कामगिरी केली. मालिकेत त्याने चार विकेट घेतल्या. ज्यात ३ कॅच आणि एक स्टपिंगचा समावेश आहे. राहुलने संपूर्ण मालिकेत दुहेरी जबाबदारी पार पाडली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. इतक नव्हे तर अखेरच्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुउपस्थितीत राहुलने कर्णधारपदाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. वाचा- राहुलने द्विपक्षीय मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. याबाबत त्याने विराट कोहलीला मागे टाकले. विराटने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १९९ धावा केल्या होत्या. अर्थात राहुलने ५ सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Uk9ZUx

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...