<strong>मुंबई :</strong> अंधेरीतील रेल्वे पूल दुर्घटनेत जखमी झालेले पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (52) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर मेहता यांच्यावर नानावटी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार सुरु होते. पण मनोज मेहता यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. अंधेरीतील गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळल्याची दुर्घटना 3 जुलै रोजी घडली. या अपघातात त्या दिवशी नेहमी प्रमाणे अंधेरी- डहाणू रोड लोकल पकडण्यासाठी आलेले मनोज मेहता हे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. राजेश बिल्डर्सच्या माध्यमातून त्यांनी पालघर- बोईसर परिसरात 30-35 वर्षांपासून अनेक गृह संकुलांची उभारणी केली. रोटरी क्लब ऑफ पालघरचे त्यांनी काही काळ अध्यक्षपद भूषवलं होते. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात परिसरात भरीव योगदान दिलं होतं. दरम्यान, याच दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचाही 7 जुलैला मृत्यू झाला होता. <strong>अंधेरी दुर्घटना कशी घडली</strong><strong>?</strong> अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला होता. यावेळी ढिगाऱ्याखाली अडकून पाच जण गंभीर जखमी झाले. हा फुटपाथ थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती.
from mumbai https://ift.tt/2LW7q49
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment