Ads

Friday, April 3, 2020

करोना: खेळाडूंशी संवाद साधताना मोदी म्हणाले...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजा ४९ खेळाडूंशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी देशातील महत्वाच्या खेळाडूंना काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया... पंतप्रधान मोदी यांनी आज ४९भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, झहीर खान, पीव्ही सिंधू, विश्वनाथन आनंद, हिमा दास, नीरज चोप्रा, मेरी कोम, विनेश फोगट, मनु भाकर या काही खेळाडूंचा समावेश होता. या संवादाबाबत सौरव गांगुली म्हणाले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या महत्वाच्या आजी-माजी खेळाडूंबरोबर संवाद साधला. पण या संवादामध्ये नेमके त्यांनी आम्हाला काय सांगितले हे मी तुम्हाला सांगू शकत नाही." याबाबत टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सूत्रांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, " मोदी यांनी आज खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी खेळाडूंना सांगितले की, लॉकडाऊन कसा पाळता येईल, याबद्दल लोकांना सांगा. त्याचबरोबर काही व्हिडीओ तयार करा. या व्हिडीओद्वारे तुम्हाला लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. त्याचबरोबर त्यांना सुरक्षित राहण्याबाबत आवाहनही करायचे आहे." करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी देशातील जनतेला संबोधित केले. 'करोनाच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. 'दिवे लावायला सांगणं हे पंतप्रधानांचं काम नाही. त्यांनी काहीतरी ठोस पावलं उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केलीय. तसंच, लोकांना मुर्खात काढू नका, असंही काही नेत्यांनी सुनावलं आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2xNYawB

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...