Ads

Wednesday, August 1, 2018

चारऐवजी तीनच बटणं दाबली, मतदाराच्या कारनाम्यामुळे निवडणुकीचा खोळंबा

<strong>सांगली :</strong> सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणूकीवेळी एका मतदाराच्या घाईमुळे इतर मतदारांना तातकळत थांबावं लागलं. घाईगडबडीत या मतदाराने चार बटणं दाबण्याऐवजी तीनच बटणं दाबल्यानं मिरजेतल्या एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रियाच बंद पडली. मिरजेतील राजेंद्र खामकरांच्या एका छोट्याश्या चुकीमुळे अनेक मतदारांचा खोळंबा झाला. मोठ्या भावाच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जाणाऱ्या राजेंद्र खामकरने केलेल्या चुकीने मतदार तातकळत राहिले. महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवेळी चार बटणं दाबावी लागतात. जोपर्यंत चारही बटणे दाबली जात नाहीत, तोवर मतदानप्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे राजेंद्र यांच्या या कारनाम्याने मतदान प्रक्रियाच खोळंबली. राजेंद्रला परत बोलावून आणून 15 मिनिटांनी चौथ्या ठिकाणी मतदान करुन घेण्यात आली. मिरजेतल्या प्रभाग क्रमांक चारच्या आयडीएल इंग्लिश स्कूलमध्ये हा प्रकार सकाळी आज बुधवारी सकाळी 8.30 ते 9 च्या सुमारास प्रकार घडला.  

from maharashtra https://ift.tt/2v7htwH

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...