<strong>नवी दिल्ली :</strong> उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या इंदूर-मनमाड रेल्वे मार्गासंदर्भात सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र-मध्यप्रदेश सरकार यांच्यात हा सामंजस्य करार झाला. 362 किमीचा हा रेल्वे प्रकल्प जेएनपीटीच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय जहाज बांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे मुंबईहून मध्य भारतातल्या अनेक स्टेशनांचं अंतर 171 किमीने कमी होणार आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधून (डीएमआयसी) हा मार्ग जात असल्यानेही याचं जास्त महत्त्व आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानतंर लखनौ, आग्रा, ग्वाल्हेर, कानपूरवरुन मुंबई किंवा जेएनपीटीत येणाऱ्या मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. याशिवाय सध्याचे जे रेल्वेमार्ग आहेत, त्यांच्यावरचा ताणही कमी होण्यास मदत होईल. इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या जेएनपीटी आणि रेल्वेच्या जॉईंट व्हेंचरने या प्रकल्पाचं काम होणार आहे. यात जेएनपीटीचा वाटा 55 टक्के, मध्यप्रदेश 15 टक्के, महाराष्ट्र 15 टक्के, रेल्वे मंत्रालय 15 टक्के असा आहे. तर प्रकल्पाचा एकूण खर्च 8574 कोटी रुपये एवढा आहे. नितीन गडकरी यांनी यापूर्वीच या प्रकल्पाची घोषणा केली होती, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लवकरच घोषणा होईल, असंही एक ऑगस्ट रोजी सांगितलं होतं. हा प्रकल्प पूर्ण होण्यास सहा वर्षे लागू शकतात, मात्र तीन ते चार वर्षात काम करण्याचा मानस असल्याचंही गडकरी म्हणाले होते. <strong>कसा असेल इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्प?</strong> 362 किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी आठ हजार 574 कोटींचा खर्च येणार आहे. महाराष्ट्रातले 186 किमी आणि मध्य प्रदेशमध्ये 176 किमी असं एकूण 362 किमी अंतर रेल्वे पूर्णपणे ब्रॉडगेज असणार 2008 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करावं लागणार 20 वर्षांच्या मुदतीचं 5445 कोटींचं कर्ज दिल्ली ते चेन्नई, दिल्ली ते बंगळुरु मार्गावरचं अंतर 350 किमीने कमी होईल
from maharashtra https://ift.tt/2C2YDx0
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
As per pre-departure requirement for UAE travelers, the three, including 13-week pregnant Rukhsar, took Rapid RT-PCR tests outside KIA and s...
No comments:
Post a Comment