Ads

Wednesday, November 3, 2021

#matchfixed... भारत-अफगाणिस्तान सामन्यात मॅचफिक्सिंग? एका व्हिडीओमुळे सोशल मीडियामध्ये राडा सुरु

आबुधाबी : भारताने अफगाणिस्तानवर दणदणीत ६६ धावांनी विजय साकारला. भारताचा विश्वचषकातील हा पहिलाच विजय ठरला. पण या विजयानंतर भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे. एका व्हिडीओमुळे सोशल मीडियामध्ये याबाबत मोठा राडा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये असं आहे तरी काय, पाहा...भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सामन्याचा हा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय संघ फलंदाजी करतानाचा हा व्हिडीओ आहे. ही गोष्ट ११ व्या षटकात घडलेली आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर आणि सामनावीर ठरलेला रोहित शर्मा एक फटका मारताना दिसत आहे. हा फटका मारल्यावर चेंडू अडवडण्यासाठी अफगाणिस्तानचा खेळाडू जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पण हा चेंडू सीमारेषेपार जात असून भारताला चार धावा मिळाल्या आहेत. या व्हिडीओनंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना फिक्स असल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे. अफगाणिस्तानचे खेळाडू या सामन्यात अभिनय करत असून सामना फिक्स असल्याचा आरोप चाहत्यांनी यावेळी केला आहे. या व्हिडिओमध्ये जेव्हा चेंडू अफगाणिस्तानच्या खेळाडूजवळ आला तेव्हा त्याला तो अडवण्याची संधी होती. तो त्याने अडवलाही. पण त्यानंतर आपल्याच हाताने तो चेंडू सीमारेषेवर ढकलल्याचा आरोप यावेळी चाहत्यांनी केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट मंडळांमध्ये चांगले संबंध आहेत. भारताने बऱ्याचदा अफगाणितस्तानच्या क्रिकेट मंडळाला आणि खेळाडूंना मदतही केली आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानने हा सामना भारताला आंदण दिल्याचेही काही चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारताने सामना जिंकल्यावर सोशल मीडियामध्ये मॅच फिक्सिंगचा ट्रेंड सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. पण याबाबतचा कोणताही पुरावा मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या चाहत्यांकडे नाही. अफगाणिस्तानच्या खेळाडूकडून चुक नक्कीच झाली आहे, पण अशा चुका क्रिकेटमध्ये यापूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळे या सामन्यानंतर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात काहीच तथ्य नसल्याचेही म्हटले जात आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यावरही असाच काहीसा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mGUALV

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...