Ads

Wednesday, November 17, 2021

IND v NZ : जे विराट कोहलीला एका वर्षात जमले नाही, ते रोहित शर्माने फक्त एकाच सामन्यात करुन दाखवलं...

जयपूर : रोहित शर्माने आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडवर विजय साकारला. पण जी गोष्ट विराट कोहलीला गेल्या एका वर्षात जमलं नव्हतं ते रोहित शर्माने आपल्या पहिल्याच सामन्यात करून दाखवलं आहे. रोहित शर्माने नेमकं काय केलं, पाहा...भारताला न्यूझीलंडचा संघ सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारी पडत होता भारतीय संघ जेव्हा २०२० साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषकातही न्यूझीलंडने पराभूत केले होते. गेल्या सामन्यात सामन्यांमध्ये भारताला न्यूझीलंडवर कोहलीच्या नेतृत्वाखाली एकदाही विजय मिळवता आला नव्हता. पण रोहितच्या पहिल्याच नेतृत्वाच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय साकारला आणि ही पराभवाची मालिका खंडीत केली आहे. त्यामुळे जी गोष्ट कोहलीला गेल्या दीड वर्षात जमली नव्हती ती गोष्ट रोहितने एकाच सामन्यात केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारताने ट्वेन्टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी केली. पण हे दोघे बाद झाल्यावर भारताची अवस्था थोडी बिकट झाली होती. अखेरच्या षटकात सामना चांगलाच रंगला होता. पण रिषभ पंतने चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा नवा कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज फटेकबाजीला सुरुवात केली. एकामागून एक रोहित धमाकेदार फटकेबाजी करत राहीला. पण यावेळी लोकेश राहुल मोठी खेळी साकारण्या अपयशी ठरला. राहुलला यावेळी १५ धावांवर समाधान मानावे लागले. राहुल बाद झाल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने आपाल रनरेट चांगलाच वाढवला. रोहित शर्मा आता अर्धशतक झळकावणार, असे वाटत होते. पण रोहितचे अर्धशतक यावेळी फक्त दोन धावांनी हुकले. रोहितने ३६ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांसह ४८ धावा केल्या. रोहितचे अर्धशतक हुकले असले तरी ही कसर सूर्यकुमारने भरून काढली आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर प्रहार करत अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार आता भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून देणार, असे वाटत असतानाच त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. सूर्यकुमारने ४० चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६२ धावा केल्या. सूर्यकुमार बाद झाला असला तरी रिषभ पंतने अखेरच्या षटकात चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cmtWSD

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...