Ads

Saturday, August 4, 2018

सोलापुरातील मालेगावात 25-30 मोरांचा मृत्यू

<strong>सोलापूर </strong><strong>: </strong>सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील मालेगाव भागत गावात 25-30 मोरांचा विषबाधेने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून मोरांचे मृतदेह गावकऱ्यांना आढळून येत आहेत. बार्शी शहरात राहणाऱ्या निसर्गप्रेमींना ही घटना कळताच, ते गावात दाखल झाले. त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये मोरांना विष देऊन मारले असल्याचं समोर आले आहे. गावातील काही लोकांनी मक्याला विष लावून मुद्दाम मोर मारले असल्याची चर्चा गावात आहे. मागील 3 दिवसांपासून गावात दररोज अनेक मोर आणि लांडोर मृतावस्थेत आढळत आहेत. त्यामुळे मोरांची शिकार केल्याच्या चर्चांना बार्शी तालुका परिसरात ऊत आला आहे. मोरांसह इतर पक्षीही मक्याचे  विषारी दाणे खाऊन मरुन पडले आहेत. तीतर, भारद्वाज, चिमण्या, कावळेही मरुन पडले आहेत. घटनेची माहिती कळताच सोलापूर येथून वनविभागाचे कर्मचारी गावात दाखल झाले असून, वनविभागाचा प्राथमिक चौकशीत शिकारीच्या उद्देशाने मोरांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

from maharashtra https://ift.tt/2vFzQZs

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...