Ads

Tuesday, November 9, 2021

भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला का मिळू शकते, जाणून घ्या मोठं कारण...

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पण ट्वेन्टी-२० मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यांमध्ये कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद कोणाला द्यायचे, हा निर्णय भारताच्या निवड समितीला घ्यावा लागणार आहे. भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार हा अजिंक्य रहाणे आहे, पण त्याच्याकडे कर्णधारपद न जाता रोहित शर्माकडे ते जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. अजिंक्यऐवजी रोहितला का मिळू शकते कर्णधारपद, पाहा...जर कर्णधार खेळणार नसेल तर उपकर्णधाराला संघाचे नेतृत्व देण्यात येते. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत जेव्हा विराट खेळला नव्हता तेव्हा संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे देण्यात आले होते. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला होता. पण त्यानंतर भारतीय संघात बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर अजिंक्य रहाणेला फलंदाजीमध्ये सूर गवसलेला पाहायला मिळाला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अजिंक्य हा सपशेल अपयशी ठरला होता. त्यावेळी अजिंक्यला संघात स्थान मिळणार की नाही, याबाबतही चर्चा सुरु झाली होती. गेल्या काही सामन्यांपासून अजिंक्यला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर अजिंक्यकडे सय्यद मुश्ताक अली ट्ऱॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण अजिंक्यच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला बाद फेरीत पोहोचता आले नाही. दुसरीकडे रोहित शर्माने विराट कोहलीकडून ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद स्विकारले आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधील कसोटी मालिकेत एक सलामीवीर म्हणून रोहित शर्मा चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे रोहितने कसोटी संघातील आपले स्थानही पक्के केले आहे. भारतीय संघ एकाचवेळी तीन संघांचे तीन कर्णधार ठेवेल, असे सध्याच्या घडीला तरी दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या फॉर्मच्या जोरावर रोहित शर्माकडे भारताच्या कसोटी संघाचेही नेतृत्व येऊ शकते, असे दिसत आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळू शकतो. या मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यश मिळवले तर कोहलीसाठी हा मोठा धक्का असू शकतो. कारण कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला न्यूझीलंडविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचे कर्णधारपद कोणाला दिले जाते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यासाठी आता काही दिवस चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. कारण येत्या आठवड्याभरात भारताचा कसोटी संघ जाहीर होऊ शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/305pi8O

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...