Ads

Thursday, August 12, 2021

भारताच्या सलामीवीरांनी उडवली इंग्लंडची दाणादाण, पहिल्याच दिवशी उभारला धावांचा डोंगर

लंडन : भारताच्या लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंडची पहिल्याच दिवशी दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करत ८३ धावांची खेळी साकारली, पण त्याचे शतक मात्र हुकले. पण राहुलने यावेळी ही कसर भरून काढली. राहुलने यावेळी चौकारानिशी यावेळी शतक पूर्ण केले. या दोन्ही सलामीवीरांच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच २७६ धावांचा डोंगर उभारता आला. राहुलने पहिल्या दिवशी १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद १२७ धावांची दमदार खेळी साकारली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले, पण त्यांचा हा निर्णय योग्य नसल्याचे रोहित आणि राहुल यांनी दाखवून दिले. सुरुवातीच्य १० षटकांमध्ये या दोघांनीही सावध खेळ केला.पण त्यानंतर रोहित शर्मा चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रोहितने सॅम करनच्या एकाच षटकात चार चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. रोहितने त्यानंतर आपेल १३वे अर्धशतकही साजरे केले. रोहित चांगल्या लयीत दिसत होता. त्यामुळे तो आता शतक झळकावणार, असे वाटत होते. पण रोहितला यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने बाद करत भारताला पहिला धक्का दिला. रोहितने यावेळी ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८३ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर काही वेळातच चेतेश्वर पुजाराही ९ धावांवर बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. पुजारा बाद झाला असला तरी त्यानंतर राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले. कोहली थोडा सावध खेळत होता आणि तो ४२ धाांवर बाद झाला. पण राहुल हा चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. त्यामुळे त्याने यावेळी चांगली फटकेबाजी केली. मार्क वुडच्या गोलंदाजीवर चौकार लगावत राहुलने यावेळी आपले शतक साकारले. राहुलने यावेळी शतक झळकावत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा विक्रम मोडीत काढला. शास्त्री यांनी १९९० साली लॉर्ड्सवर सलामीवीर म्हणून खेळताना १०० धावांची खेळी साकारली. राहुलने यावेळी शतक झळकावत हा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ किती धावा उभारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fY1Dw4

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...